live now
Dasara Melava LIVE : महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही – ठाकरे
Dasara Melava LIVE : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, आज (दि.12) राज्यात राजकीय दसरा मेळाव्यांचे सोने लुटले जाणार आहे. नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा, तर, भगवान गडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर, दुसरीकडे संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. या सर्व राजकीय दसरा मेळाव्याचा रिअल टाईम अपडेट देणार लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
शिंदेला गोळी मारणं योग्यच पण...
उपस्थितांना संबोधित करताना ठाकरेंनी बदलापूर अत्याचार प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, नराधम शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आनंद दिघे जर असते तर, त्यांनी देखील या पापासाठी शिंदेला गोळी घातलीच असती. महिलांवर अत्याचार करणाऱ्या शिंदेला गोळी घातली ते बरचं झालं. शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये त्याला मारायलाच पाहिजे होता पण, शिंदेला मरल्यानंतर जसं आपल्या मराठीत म्हणतात की, म्हातारी मेली त्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावतोय असे ठाकरे म्हणाले. शिंदेला गोळी घातली कारण या प्रकरणात ज्यांचा सहबाग होता त्या सर्वांना वाचवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही शिंदेला गोळी घातली असेल. त्यामुळे या गोष्टीचादेखील उलगडा झाला पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.
-
चंद्रचूडसाहेब तुम्हाला ऐतिहासिक संधी - ठाकरे
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्याायालयात केस दाखल करण्यात आली आहे. यावर बोलताना ठाकरेंनी सरन्यायाधीशांना उद्देशून आवाहन केले आहे. ते म्हणाले की, चंद्रचूडसाहेब तुम्हाला ऐतिहासिक संधी असून, आम्हाला न्याय देण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे. तीन सरन्यायधीश येऊन गेले तरी, या ऐतिहासिक केसचा निकाल लागू शकलेला नाही.
-
प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार; ठाकरेंची मोठी घोषणा
आपलं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते म्हणाले की, ते आमचे दैवत असून होय आम्ही आमच्या देवऱ्यातही छ.शिवाजी महाराजांची पूजा करणार. जसे आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार असे ठाकरे म्हणाले. जय शिवराय हा तर माझ्या महाराष्ट्राचा मंत्र असल्याचेही ते म्हणाले.
माझी तर अशी इच्छा आहे की, छ. शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात सर्वप्रथम आरबार उभं केलं म्हणून ते आयएनएस शिवाजी वगैरे ते आल्याचे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हात मी छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारीनचं पण, आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभे राहिले पाहिजे. मंदीर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही तर, त्यांच्या आयुष्यातील जे काही प्रसंग आहेत ज्याला पुरावे आहेत हे सगळे प्रसंग त्या मंदीरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्र निमित्ताने किंवा त्यादृष्टीने कोरले जातील किंवा दाखवले जातील.
-
कितीही पिढ्या येऊ देत, त्यांच्या उरावर बसून भगवा फडकवणार
भाजप वाढवणं हे आमचे पाप आहे. आम्ही यांना डोक्यावर बसवलं पण आता मला भाजपला खांदा द्यायचा आहे. असे म्हणत आपल्याला उखडून फेकण्यासाठी कितीही पिढ्या येऊ देत, या सर्वांच्या उरावर बसून मी भगवा फडकवणार आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. मला संघाबद्दल आदर आहे, भागवतांबद्दल आदर आहे, पण ते जे काही करत आहेत त्याचा आदर नाही असेही ठाकरे म्हणाले. विरोधकांकडून मला रोज मला शिव्या दिल्या जात आहेत, पण तुमचे आशीर्वाद आहेत तोवर माझा कोणी बाल ही बाका करू शकणार नाही. तुमचं पाठबळ नसतं तर मी उभा राहू शकलो नसतो. हे ऋण या जन्मी फेडता येणार नाही असेही ठाकरे उपस्थितांना म्हणाले.
-
मोदी-शाहंना शिव्या देऊन मिळलेली मते तुम्हाला लखलाभ - शिंदे
महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेली मते ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या देऊन मिळालेली आहे. ती तुम्हालाचा लखलाभ राहू दे. जर, राज्यात सत्तांत्तर झालं नसतं तर, लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. लाडक्या बहिणींची योजना आली नसती असे शिंदे म्हणाले. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
-
घासून नाही ठासून 2 वर्षे पूर्ण केली- मुख्यमंत्री शिंदे
घासून नाही ठासून 2 वर्षे पूर्ण केली आहेत, मला हलक्यात घेऊ नका असे म्हणत शिंदेंनी पहिला बाण सोडला आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे ही घोषणा बाळासाहेबांनी देशाला दिली. पण काहींना हिंदू या शब्दाची लाज वाटू लागली आहे. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटत असल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंचे नाव न घेता केली. मात्र, आपण अशा लोकांपासून शिवसेना मुक्त केली, आणि अशाच आझाद सेनेचा हा आझाद मेळावा असल्याचे शिंदे म्हणाले.
-
हे साल महत्त्वाचे, ही लढाई महत्त्वाची - आदित्य ठाकरे
पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला संबोधित करतोय. दसऱ्याला काय तर आज्याचं भाषण नंतर वडिलांचे भाषण ऐकायला. बाळासाहेबांनी बळ दिलं आणि तलवार दिली आणि युवासेना इथेच उभी केली. 14 वर्षात मी भाषण केलं नाही . मात्र उद्धव साहेब आले की मी थांबणार आहे . हे साल महत्त्वाचे, ही लढाई महत्त्वाची असे म्हणत महिनाभरात आपलं सरकार येत आहे अशी गर्जना आदित्य ठाकरेंनी केली. आपलं सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल बाहेर काढली जाणार असून, अधिकारी असो किंवा राजकारणी ज्यांनी लूट केली त्यांना आत टाकणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. हा महाराष्ट्र तुम्हाला शिक्षा देणार घरी तरी बसविणार किंवा जेलमध्ये तरी बसविणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी युनिफॉर्म, झाडांमध्ये घोटाळा, सॅनेटरी पॅड वेंडिग मशीन घोटाळा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात घोटाळा अशा घोटाळ्यांचा पाढाच वाचला.
-
लाडकी बहिणींनो 1500 रुपये कचकून घ्या - अंधारे
अंधारेंनी भाषणावेळी राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून जोरदार हल्लाबोल करत लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून किंवा मुख्यमंत्र्यांनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही. ते सरकारचे पैसे आहे. तुम्ही पोस्टमन आहात. त्याचे मोक्कार क्रेडिट घ्याचे नाही.
-
सरसंघचालक मोहन भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला द्यावा - सुषमा अंधारे
आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे. सांप्रदायिक विभाजन नको आहे. पण फडणवीसांनी राज्यात द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला द्यावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. फडणवीसांनी माणसातला माणूस ठेवला नाही असेही अंधारे म्हणाल्या. फडणवीस म्हणजे फेक नरेटिव्हचं महाकेंद्र आहे. कोकणमध्ये न चालणारी चिल्लर राज्यात सभा घेत आहे. यामुळे द्वेश पसरत आहे. चाराणे बाराणे हिंदु मुस्लिम वाद लावतात. पण त्याला राज्यातली जनता बधली नाही असे अंधारे म्हणाल्या.
-
शिवाजी पार्कवर भाषणाला सुरूवात
ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अनेक नेत्यांचं आगमन होण्यास सुरूवात झाली असून, उद्धव ठाकरेदेखील थोड्याचवेळात शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत. त्याआधी दाखल झालेल्या नेत्यांच्या भाषणास सुरूवात झाली आहे.
-
कल्याण रेल्वे स्थानकावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने
कल्याण रेल्वे स्थानकावर शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्यानंतर मोठी घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मेळावे होत असल्याने, मेळाव्यासाठी निघालेले दोन्ही गटाचे कार्यकर्ते कल्याण रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटांकडून स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
शिवसेनेच्या मेळाव्यासाठी ठाण्याहून मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते रवाना
शिंदेंच्या आझाद मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी ठाण्यामधून महिला व पुरुष आणि शिवसेना कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी महिलांसाठी खूप काही योजना आणल्या. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याला आम्ही महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने जाऊ आणि संपूर्ण मैदान भरून टाकू अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली. यापुढे देखील असेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभो व सर्वच स्तरातील नागरिकांचा महाराष्ट्रातील जनतेचा फायदा होवो, यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला जात असल्याच्या भावना दसरा मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी दिल्या आहेत.
-
पुढच्या दसऱ्या मेळाव्यात ठाकरेंच्या नावासमोर मुख्यमंत्री लिहून यावे
शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी दसरा मेळावा हा एकच असतो असे म्हणत पारंपारिक दसरा मेळावा शिवतीर्थावरचाच आहे. मुंबईत इतर ठिकाणी इव्हेंट होतात त्या इव्हेंट वरती बोलणार नाही असा अप्रत्यक्ष टोलाही अंधारे यांनी शिंदेंच्या मेळाव्याला लगावला. बाटक्यांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज पडत असते की, आम्ही खरे आहोत, सोनं कधी स्वतःहून ओरडून सांगत नाही किंवा वाघाला कधी सांगायची गरज पडत नाही वाघाच्या आगमनाची चाहूलच जंगलातली शांतता अधोरेखित करत असते असे अंधारे म्हणाल्या.
राज ठाकरेंनाही सुनावले
यावेळी बोलताना अंधारेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही चांगलेच खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या की, जे पीचवर खेळतात किंवा मैदानावर खेळतात जयघोष त्यांच्या नावाचा होत असतो. जे पॅव्हेलियनममध्ये बसलेले असतात ते फक्त आणि फक्त कॉमेंटेटर असतात असा टोला अंधारेंनी राज ठाकरेंना लगावत कॉमेंट्रीकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. जे कुठलीच निवडणूक लढवत नाहीत आणि सातत्याने आपली भूमिका बदलतात आणि महाराष्ट्राला लुटणाऱ्या सोबत जातात अशा कॉमेंटेटर बोलण्याची गरज नाही. दसऱ्या दिवशी हेच मागणं आहे की, पुढचा दसरा मेळावा ऐकताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा असे लिहून यावे.
-
"पंधराशे रुपयाची भीक नको, सुरक्षा हवी", मोमीन बाप-लेकीनं वेधलं लक्ष
बीडमधील मनोज जरांगे आणि पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर तर, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात संगमनेरवरून आलेल्या याकूब मोमिन आणि त्यांच्या मुलीनं अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंधराशे रुपयाची भीक नको, सुरक्षा हवी बदलापूर सारख्या घटना नको, मुख्यमंत्री ठाकरे व्हायला हवेत अशा आशयाचे बॅनर लावून ते दसरा मेळाव्यात सहभागी झाले आलेत.
-
आपल्याला आपला डाव खेळायचाय - पंकजा मुंडे
उपस्थितांना संबोधित करताना पंकजा म्हणाल्या की, मी कुणाला घाबरत नसून, माझं भाषण ऐकायला आलेल्यांना मी घाबरते असे म्हणत. आपल्याला आपला डाव खेळायचा असल्याचे पंकजा म्हणाल्या. तुम्ही मला जिंकवून इज्जत दिली. माझा पराभव झाल्यानंतर त्याहून इज्जत दिली मी हरल्यामुळे अजितबात नाराज नाही. उसतोड कामगारांचे जीवन बदलल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही असे म्हणत मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार असल्याचे पंकजा म्हणाल्या.
-
लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे
माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिल्याचे म्हणत इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता असे म्हणत लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू असल्याचे पंकजा म्हणाल्या. माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही, पण जे सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथे मनापासून स्वागत करते असे पंकजा म्हणाल्या. येथे आलेले 18 जातीचे बांधव तुम्हाला मी दरवर्षी साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या वडिलांनी मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकली असल्याचे पंकजा म्हणाल्या.
-
हिंदीतून कविता म्हणत पंकजांनी केली भाषणाला सुरूवात
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, हिंदीतून कविता म्हणत पंकजा मुंडे यांची भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंकजा म्हणाल्या की, माझा मुलगा आर्यमानपेक्षा ही जनता मला जास्त प्रिय आहे. पोटच्या लेकरापेक्षा मी तुमच्यावर माया करते.
-
मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही, कारण...
बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचेही मुंडे म्हणाले.
अनेक वेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडेपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात. अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला, सोबत कोण आहे बघितलं नाही. भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी 12 वर्ष आपलं पटलं नाही. तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात आणला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा असे मुंडे म्हणाले.
संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं असल्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेलो आहे. पंकजा मुंडेंनी खूप संघर्ष केला आहे. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. 'तुम लाख कोशिश करो हमे हराने की हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे'
-
आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा...
दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना जरांगेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. ते म्हणाले की, आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा सरकार उलथवून टाकायला हा समाज मागे पाहणार नाही. इथून मला सर्वकाही सांगता येणार नाही. आता सर्व जवळ आलंय. त्यांनी सर्व केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही असे म्हणत आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार असे जरांगे म्हणाले. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमचा मान, शान, लेकरं सुखी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली असल्याचेही जरांगेनी सांगितले.
-
जाताना आनंद घेऊन जा आणि दु:ख माझ्याकडे देऊन जा - जरांगे
अन्यायाविरोधात लढायला हिंदू धर्माने शिकवलं. कायद्याने आणि संविधानाने शिकवलं, अन्याय सहन करायचा नाही. अन्याय होत असेल तर न्यायासाठी लढायचं हे शिकवलं आहे, असे म्हणत मनोज जरांगेंनी उपस्थितांना जाताना आनंद घेऊन जा आणि दु:ख माझ्याकडे देऊन जा असे आवाहन केले. वेळप्रसंगी मरण पत्करेल पण तुमची मान खाली घालू देणार नाही असा विश्वासही जरांगेंनी दिला.
-
जरांगेंची पवारांवर टीका
काहीजण पावसात भिजतात ते कशासाठी भिजतात मात्र, आपण जातीसाठी भिजू असे म्हणत मनोज जरांगे यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. मी ओरिजनल भक्त, ड्युप्लीकेट भक्त तिकडे आहेत. बुडबुडे फार दिवस टिकत नाहीत. आपण चालत राहायचं, तुमची लेकरं मोठी व्हावीत म्हणून मी सहन करतोय असे म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडे यांना लगावला.
-
मराठा समाज कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाही
मराठा समाजवर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. हा समाज कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाही. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय राज्यात समुद्रासारखा पसरला आहे.
-
नारायण गडाचा आशीर्वाद दिल्लीही वाकवतो - जरांगे
नारायण गडानं जातीवाद न करण्याची शिकवण या गडाने दिली आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण या गडाने दिली आहे. या गडाची महिमा, किमया आणि आशीर्वाद ज्याच्या ज्याच्या पाठिवर पडतो तो दिल्लीही वाकवतो असा