नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचं निधन; हैदराबाद येथे सुरू होते उपचार

नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचं निधन; हैदराबाद येथे सुरू होते उपचार

Nanded MP Vasantrao Chavan passed away : नांदेडचे काँग्रेसचे खासदर वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. (Vasantrao Chavan) मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर त्यांची आज 26 ऑगस्ट पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Maratha Protest : आंदोलक आक्रमक! राज्यभरात जाळपोळ, तोडफोड अन् राजीनामा नाट्य

काही दिवसांपूर्वी वसंतराव चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वसंच चव्हामांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

वसंत चव्हाण यांची कारकीर्द

नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण हे ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांशिवाय काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं. वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते.

 भाजपचे अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेसमधून निवडून आल्याचा मला अभिमान

अपक्ष म्हणून विधानसभेवर

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशोक चव्हांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला. वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube