‘निकष बाजूला ठेवा, कागदी घोडे न नाचवता जेवढं नुकसान झालं, तेवढी मदत करा’; थोरात आक्रमक

  • Written By: Published:
‘निकष बाजूला ठेवा, कागदी घोडे न नाचवता जेवढं नुकसान झालं, तेवढी मदत करा’; थोरात आक्रमक

नाशिक : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरची खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उरलेसुरले पिकं आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता पंचनामे आणि पाहणी निकषात न अडकता शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले, तेवढी मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

Uttarkashi Tunnel Rescue : योगा, मॉर्निंग वॉक काय-काय करत होते मजूर; पंतप्रधानांचा मजुरांशी संवाद 

थोरात यांनी आज अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी, माजी आमदार शिरीष कोतवाल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहिर, प्रदेश काँग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे महापालिका करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार; आगामी निवडणुकीसाठी भाजपची ‘आयडिया’ 

कागदी घोडे न नाचवता तात्काळ मदद द्या – थोरात
माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या संकटामुळं अगोदरच शेतकरी अडचणीत असतांना आता झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. नाशिक जिल्हाला या गारपिटीचा मोठा फटका बसला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. मका, सोयाबीन, धान, कांदा, टोमॅटो, कांदा रोपवाटीका, ज्वारी, द्राक्षे यासह फळबागा गारपीटीने नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या होत्या. त्याला आधाराची आणि मदतीची गरज असून सरकारने पंचानामा, पाहणी, निकष याचे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत तात्काळ द्यावी, असे थोरात म्हणाले.

…अन्यथा धारेवर धरू
राज्य सरकारचा मागील अनुभव चांगला नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री मोठमोठ्या घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत आहेत मात्र शेतकऱ्यांना मदत करत नाहीत. सरकारने विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावून शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळवून द्यावी. शेतकऱ्यांना मदत करण्यास सरकारने चालढकल केल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा थोरात यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube