“आता ही माझी शेवटची निवडणूक, तुम्ही मला..”, कर्डिलेंनी स्पष्टच सांगितलं

“आता ही माझी शेवटची निवडणूक, तुम्ही मला..”, कर्डिलेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Elections : ‘राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. तुम्ही मला गेली 25 वर्ष भरपूर दिले. वयाचा विचार केला पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे. गावातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरून काम करा. माझ्याकडे कुणीही आले त्यांचे काही काम असेल तर मी नक्की करतो. गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसलो तरी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मला आमदार असल्यासारखे वाटले. विकासकामे करण्याची चिंता तुम्ही करू नका ती जबाबदारी माझी आहे’, अशा शब्दांत भाजप नेते तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी उपस्थितांना विश्वास दिला.

नगर तालुक्यातील कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी ते छत्रपती संभाजीनगर महामार्गपर्यंत रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ माजी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्डिले बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, व्हाईस चेअरमन रभाजी सुळ, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, विलास शिंदे, कैलास पठारे, शिवाजी दुशिंगे, गोविंद वाघ, इस्माईल शेख, आदेश वाघ, मिनीनाथ दुशिंगे, मोनिका आढाव, सुभाष आढाव, बाळासाहेब वाघ, जगन्नाथ मगर, प्रयाग लोंढे, सुधीर भापकर, भाऊसाहेब ठोंबरे, मंजाबापू घोरपडे, दीपक कार्ले, आदेश भगत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सुजय विखेंनी बाह्या सरसावल्या..

यानंतर सुजय विखे म्हणाले, ‘नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी मदत व्हावी यासाठी पशुखाद्य कारखाना टाकण्यासाठी पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात खाद्य उपलब्ध होईल. जिरायत दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. ही त्यांची शेवटची निवडणूक असून त्यांनी आपल्यासाठी गेली 25 वर्ष त्याग, संघर्ष केला आहे. आता आपल्यावर परतफेड करायची वेळ आली आहे आजची सभा ही पावसात झाली असून ते आता नक्कीच निवडून येणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरही आहे. त्यांनी देखील प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येण्याचे काम केले ही सोपी गोष्ट नाही.’

‘मला कधीच पदाचा मोह नव्हता. मी राजकारणातून युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी काम करायचे स्वप्न पाहिलेले असून नगर जिल्ह्याचे चित्र बदलायचे आहे. मी मागील निवडणुकीमध्ये विकासकामाचे दिलेले शब्द पूर्ण केले. तेव्हाच दुसऱ्या निवडणुकीला जनतेसमोर मत मागायला आलो होतो. मात्र दुधाच्या अनुदानाचे सॉफ्टवेअर नवीन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली आता खटाखट पैसे येतात. आता कांद्याला देखील चांगला बाजार आहे. मी खचणारा माणूस नसून माझी ओळखी पदापेक्षा मोठी आहे. मी लोकांच्या मनामध्ये विकासकामांच्या माध्यमातून स्थान निर्माण केले आहे.’

मी विकासकामांत राजकारण करत नाही : विखे

‘नगर तालुक्याचे चित्र माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विकासकामातून बदललेले आहे. गेल्या 25 वर्षात शेती, डीपी, शाळा खोल्या, वाड्यावस्त्यांपर्यंत रस्त्यांची कामे केली असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने नगर तालुक्याचे शिल्पकार आहेत. मी पिंपळगाव उज्जैनी गावात विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. तरीदेखील मला लोकसभेमध्ये 300 मते कमी पडली. मात्र मी कधीही विकासाच्या कामात राजकारण करत नाही. जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा प्रयत्न आहे’, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

मी सांगितलेली कामे करुन दाखवा; सुजय विखेंचं लंकेंना खुलं चॅलेंज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube