ही योजना केल्याशिवाय सोडणारच नव्हतो Ram Shinde

  • Written By: Published:
ही योजना केल्याशिवाय सोडणारच नव्हतो Ram Shinde

अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला.

किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या देत आ रोहित पवार यांनी सदर तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत लाभार्थी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

मात्र आपण हाती घेतलेले काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून आणि सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेणारच आहे असे म्हंटले. विधानसभेच्या पराभवानंतर बंद पडलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेचे पुन्हा नव्याने नारळ फोडत काम सुरू केले. असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी आ. शिंदे सोबत खा. सुजय विखे यांच्यासह तालुक्यातील राजकीय पदाधिकारी आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube