Video : राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले; 6 जुलैचा मुहूर्त निवडत सरकारला दाखवणार ताकद

  • Written By: Published:
Video : राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले; 6 जुलैचा मुहूर्त निवडत सरकारला दाखवणार ताकद

MNS Rally Againts Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून, येत्या6 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा (MNS Rally Againts Hindi Language)काढण्यात येणार आहे. सरकारच्या हिंदी बाबतची भूमिका मान्य नसल्याचा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पुनुरूच्चार केला आहे. सहा जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी पालकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची नको; ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे याचं स्पष्ट मत

मोर्चात कोणताही झेंडा नसेल, मराठी हा एक अजेंडा असेल

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी सांगितले की, हिंदी लादण्याचा केंद्रातील अधिकाऱ्यांचा अजेंडा असून, हा अजेंडा कोणत्याही परिस्थितीत लादू देणार नसून, हिंदी सक्ती होऊ देणार नाही. हिंदी सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात कोणताही झेंडा नसेल असे सांगत यात केवळ मराठी हा एक अजेंडा असेल असेही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

कोण कोण सहभागी होत ते बघणार

हिंदी सक्ती विरोधात काढण्या येणाऱ्या मोर्च्यात कोण कोण नेते सहभागी होतात आणि कोण सामीन होत नाही ते मला बघायचं आहे. यावेळी दादा भुसेंसोबत काय चर्चा झाली याबाबत विचारले असता ते म्हणाले की. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दादा भुसे यांच्याकडे नव्हती. त्यामुळे सरकारचे सर्व दाखले फेटाळून लावल्याचे राज ठाकरे म्हणाले.

चौथीपर्यंत हिंदी नको कोणत्याही भाषेला..;, अजितदादांनीच दिला घरचा आहेर; हिंदी सक्तीवर थेट वक्तव्य

सरकारला महाराष्ट्राची ताकद दिसेल 

मोर्चासाठी 6 जुलैची तारीख का काढली याचाही खुलासा राज ठाकरेंनी यावेळी केला. ते म्हणाले की, मोर्चासाठी मुद्दाम 6 जुलैचा दिवस निवडण्यात आला आहे. या दिवशी रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना येणे शक्य होईल असे सांगत या दिवशी सरकारला महाराष्ट्राची ताकद दिसेल असे म्हणत ठाकरेंनी एकप्रकारे राज्य सरकारला इशाराच दिला आहे. कोणतेही भांडणापेक्षा मराठी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. विठ्ठलाला साकडं घालतो सरकारला सू बुद्धी दे. भाषा सोडून दुसरी कोणती गोष्ट आहे त्याला आमचा पाठिंबा असेल. पण, भाषेच बंधन का यामागे लॉजिक काय? शिक्षकांना पगार द्यायला पैसे आहे का? कांत्राटदार पैशासाठी बोंबलत आहे असे सांगत एखादी मोठी गोष्ट लपवण्यासाठी विषय डायवर्ट करण्यासाठी हिंदी सक्तीचा घाट घातला जातोय का? अशी शंका उपस्थित असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube