‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

Uddhav Thackeray : निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्य टीकेला धार दिली आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गटांच्या सुनावण्या सुरू असतानाच ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर सामनातून जळजळीत टीका केली आहे. यावेळी ठाकरे गटाने अजित पवार यांनाही सोडल्याचे दिसत नाही. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही, असे निरीक्षण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तरीही फुटिरांच्या हाती पक्ष व चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार आहे. अशा निवडणूक आयोगासमोर शरद पवार (Sharad Pawar) यांना हुकूमशहा ठरवले जाते व उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ठाकरे-पवार यांच्या कारभाराने अनेक दगडांना शेंदूर फासून त्यांना देवत्व दिले. पण, मिंधे-अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले व देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून मोकळे झाले.

NIA : मोठी बातमी! PFI संबंधित ठिकाणांवर छापेमारी; दिल्ली, युपी, राजस्थानातही कारवाई

शरद पवार हुकूमशहा आहेत त्यांनी घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, असा युक्तिवाद अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमो केला. पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाने दावा सांगितला व निवडणूक आयोग अजित पवारांच युक्तिवाद ऐकून घेत आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष हजर होते व अजित पवारांचे वकील राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असे नरडे ताणून सांगत होते.

म्हणून ईडीने अजित पवारांना हात लावला नाही

एखाद्या पक्षातून काही आमदार किंवा खासदार फुटल्याने पक्ष त्यांच्या मालकीचा होत नाही. आज त्यांना पक्ष व चिन्ह दिले व हे सर्व आमदार-खासदार उद्या निवडणुकीत पराभूत झाले तर आयोगाच्या निर्णयाचे बाराच वाजतील. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली तशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. याच दोन्ही पक्षांनी शिंदे व अजित पवार सारख्यांना पदे दिली. त्यामुळे मूळ पक्ष महत्वाचा. आता शरद पवार हे घर चालविल्याप्रमाणे पक्षाचा कारभार चालवतात असे अजित पवार म्हणतात. पक्ष घरातलाच असल्यामुळे अजित पवार चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकले व श्री. शरद पवार यांचा वरदहस्त होता म्हणूनच ईडीने अजित पवारांना तसा हात लावला नाही. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी बेईमानी केली हे ठीक, पण त्यांनी मातृपक्षावरच दावा सांगितला ही लफंगेगिरी म्हणावी, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूना प्रवेश द्या; नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube