हे मराठी माणसाचं यश! हिंदी GR’रद्दच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, फडणवीसांनाही दिलं ‘हे’ उत्तर

Uddhav Thackeray on Hindi GR Cancelled : हा मराठी माणसाचा विजय आहे. (Hindi) मात्र, सर्व मराठी बांधवांना मी सागतो की, यापुढं कोणतही संकट येण्याची वाट पाहू नका. कायम सावध राहिलं पाहीजे असं म्हणत हिंदी सक्तीबाबत सरकारने दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच, यावेळी ठाकरे यांनी ५ जुलै रोजीचा मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी त्या दिवशी विजयी सभा घेण्याचा विचार असल्याचं बोलून दाखवल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी नीट कळत का? असा प्रश्न उपस्थित करत भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे. तसंच, मी मुख्यमंत्री असल्याने फक्त अभ्यास समिती नेमली होती. त्याला यांनी जीआर काढला अशी अफवा उठवली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरा मराठी नीट समजून घ्याव म्हणजे त्यांना कळेल असं म्हणत आपण असा जीआर काढला होता हा भाजपचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.
हिंदी सक्तीचे निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एकजुटीचा धसका
5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला. जीआर कोणी काढला होता. मागे हरिश्चंद्राची फॅक्ट्री पिक्चर आला होता. तसा भाजप खोट्याची फॅक्ट्री झाली आहे. अफवांची फॅक्ट्री झाली आहे. अफवा पसरवायच्या, खोटंनाटं कथानक तयार करायचं आणि मते मिळवायची हा भाजपचा धंदा झाला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच, 5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत असंही ते म्हणाले.
मराठी माणसाला आवाहन आहे की संकटाची वाट पाहू नका. ही जाग कायम ठेवा. त्याचबरोबर आता सरकारने हिंदी सक्तीबाबत कोणतीही समिती नेमली तरी त्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही. सक्ती संपली. कुणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. सक्ती होऊ देणार नाही.