‘राज ठाकरेंनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारायला हवा’, फडणवीसांनी सांगितली जुनी गोष्ट

‘राज ठाकरेंनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारायला हवा’, फडणवीसांनी सांगितली जुनी गोष्ट

Devendra Fadnavis Criticized Raj Thackeray : हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही (Hindi Language Row) जीआर रद्द करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घोषणा केली आहे. त्रिभाषा सुत्राबाबद नरेंद्र जाधव (GR) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, याच वेळी त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी हिंदीबाबत (Raj Thackeray) पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा असा टोला लगावला.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सोमवार 30 जूनपासून सुरू होणार आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकारची आणखी कोंडी करण्याचा प्लॅन विरोधकांनी आखला होता. परंतु, याआधीच आज फडणवीस यांनी हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणाच करून टाकली. या घोषणेनंतर विरोधकांचा प्लॅन काही प्रमाणात फसला आहे.

हिंदी सक्तीचे निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एकजुटीचा धसका..”

हिंदी सक्तीविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, हिंदी आणि इंग्रजीबाबतची शिफारस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेत्यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी हिंदीबाबत पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारायला हवा. सन 2020 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वातील या समितीत 18 सदस्य होते. त्यावेळी ठाकरेंच्या नेत्यांकडूनच हिंदी आणि इंग्रजी भाषांबाबतची शिफारस करण्यात आली होती. शिवसेनेचे विकास कदम यांनी ही शिफारस केली होती. समितीचा अहवाल 2021 मध्ये मंत्रिमंडळासमोर आला होता. नंतर शासन आदेशही प्रसिद्ध झाला होता. याबाबतच्या कॅबिनेटच्या मिनिट्सवर उद्धव ठाकरेंची सही आहे, असा खुलासा फडणवीस यांनी केला.

तुम्ही ठाकरे बंधुंच्या मोर्चात सहभागी होणार का? गुगली प्रश्नावर अजितदादांचं खास उत्तर म्हणाले, “मोर्चाची वेळ..”

आता हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे आला म्हणून आवाज उठवत आहात. त्यावेळी झालेल्या प्रक्रियेत राज ठाकरेंचा सहभाग नव्हता. त्यावेळी ते सत्तते नव्हते. त्यामुळे आता त्यांनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारायला हवा की जर याला तुम्ही याला मान्यता दिली होती तर आता कोणत्या तोंडाने आंदोलन करत आहात ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube