सरकारच्या याचिकेनंतर वनताराने मागितली माफी, माधुरीसाठी नांदणीमध्ये पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव

Madhuri elephant : माधुरी हत्तीणीला (Madhuri elephant) वनतारामध्ये (Vantara) नेल्यापासून नांदणी मठ (Nandani Math) आणि कोल्हापूरकरांमध्ये असंतोष आहे. माधुरीला परत आणावे अशी मागणी कोल्हापूरकर करत आहे. यासाठी त्यांच्याकडून आंदोलनही केले गेलेय. दरम्यान, जनभावना लक्षात घेत राज्य सरकारने आता या प्रकणात लक्ष घातलं. माधुरीला परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करेल, असं सरकारने सांगितलं. सरकारच्या या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच माफी मागितली.
उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकाच दिवशी दिल्ली दौऱ्यावर; टायमिंग अन् नव्या समिकरणाची चर्चा
वनताराचे अधिकृत निवेदन
नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो.
यातील वनताराचा सहभाग मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशांनुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे. माधुरीला हलविण्याचा निर्णय न्यायालयाने त्यांच्या अधिकारात घेतला होता. स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर सुरू केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता.
60 लाखांचा फ्लॅट पण, पिण्याच्या पाण्याची बोंब; वाघोलीतील गार्डियन बिल्डरविरूद्ध रहिवाशांचा शड्डू
कायदेशीर वर्तन, प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल. त्याशिवाय मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल.
प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतील:
• सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव
• पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे
• शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
• विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास
• साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा
• पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
• सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना
• माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म
• पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे.
मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल.
हा प्रस्ताव केवळ आंतराराष्ट्रीय मानकांनुसार माधुरीच्या भविष्यातील काळजीबाबत मा. न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे सुलभ पालन करण्यासाठी माडंण्यात आला आहे, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. वनताराच्या कोणत्याही श्रेय, मान्यता किंवा निहित हितासासाठी हा प्रस्ताव नाही. ही केवळ शिफार आहे, बंधनकार किंवा लादलेली अट नाही. त्यापुढे जाऊन नांदणी मठास हवे असलेले सर्व सहाय्य कऱण्याची वनताराची इच्छा आणि तयारी आहे.
आमच्या सहभाग केवळ न्यायालयीन निर्देशानुसार असला तरी, जैन समुदायाला किंवा कोल्हापुरच्या लोकांना त्यामुळं त्रास होत असेल तर आम्ही मन:पूर्वक खेद व्यक्त करोत. मिच्छामी दुक्कमडम – जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुखावले असते तर आम्ही तुमची क्षमा मागतो.
आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू.
-आदरपूर्वक सादर,
टीम वनतारा