Maharashtra Tiger: राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ, कोणत्या जिल्ह्यात किती वाघ?

Maharashtra Tiger: राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ, कोणत्या जिल्ह्यात किती वाघ?

Maharashtra Tiger Population:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच देशात 3 हजार 167 वाघ असल्याची घोषणा केली होती. राज्यात सध्या 446 वाघांची संख्या नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 23 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 206 ते 248 वाघ आहेत. वाइल्डलाइफ सोसायटी ऑफ इंडिया (Indian Wildlife Society) आणि नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटीने (National Tiger Conservation Authority) केलेली गणना पंतप्रधानांनी नुकतीच जाहीर केली होती.

या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 446 वाघांची नोंद झाली आहे. राज्यातील 446 वाघांपैकी 206 ते 248 वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91, ब्रम्हपुरी वनविभागात 53 ते 66, मध्यचांदा वनविभागात 10, वरोरा-भद्रावती वनविभागात 13, राजुरा विभागात 2 आणि कन्हाळमध्ये 26 ते 43 वाघ आहेत.

Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या

625 चौरस किलोमीटरवर पसरलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक अधिवास आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात मांसाहारी प्राणीही वाघांची शिकार करत असल्याने एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91 वाघ आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील उष्ण हवामानामुळे प्रजनन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

अपुऱ्या अधिवास क्षेत्रामुळे मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाली असून, दोन वाघांच्या मारामारीत वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून वाघांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करायचे असेल, तर वाघांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube