कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे…

कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे…

आमदार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गोडवे गात असल्याचं दिसून येत आहे. पदापेक्षा काम महत्वाचं अन् काम शिंदे सरकार देत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. त्यावरुन सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणारे बच्चू कडू अचानक मुख्यमंत्री शिंदेंचे गोडवे गात असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

अहमनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला ठोकल्या बेड्या

बच्चू कडू म्हणाले, राज्यात आता एवढा मोठा स्फोट झाला आहे बाकी काही राहिलेलच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे 40 आमदार तर उरलेले ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे आता तेच उरलेले जातात की काय हे येणाऱ्या काळात समजणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Pushpa 2 Bus Accident: ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या बसचा झाला अपघात; दोन कलाकार जखमी

तसेच राज्यातील कोणताही आमदार मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराज नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री होण्याआधीच एवढा निधी दिला आहे. त्यामुळे लोकं कोणीही नाराज नाहीत. शेवटी आमदारांना पदापेक्षा काम महत्वाचं आहे आणि काम शिंदे सरकार देतं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. कडू यांची दिव्यांग विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube