“आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर”.. बच्चू कडूंनी भाजपला पुन्हा डिवचले

“आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर”.. बच्चू कडूंनी भाजपला पुन्हा डिवचले

Bachchu Kadu Criticized BJP : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. शिंदे गटातील काही नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आधीपासूनच भाजपवर प्रहार करत आले आहेत. आताही त्यांनी पुन्हा भाजपला डिवचले आहे. काही लोकं म्हणतात आम्ही निधी आणला. आमचं सरकार आहे. पण भाजपवाले तर बाहेर होते, आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचे काय जमले असते. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आले, असे भाजपाला टोचणारे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था कढिपत्त्यासारखी!

बच्चू कडू पुढे म्हणाले, कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या इतक्या मोठ्या प्रमाणात अचलपूरसाठी निधी आणला का. आता काही लोकं म्हणत आहेत की हा निधी आम्हीच आणला. सरकार आमचं आहे. भाजपवाले तर सत्तेच्या बाहेर बसले होते. आम्हीच भाजपला सत्तेत आणले त्यावर आता तुम्ही काय बोलणार असा सवाल उपस्थित करत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं असे कडू म्हणाले.

मी मतदारसंघात सातत्याने फिरत असतो.  गोरगरिबांचे प्रश्न मांडत असतो. गावात फिरत असताना नागरिकांचे घरकुलासाठी अर्ज येतात. एकाकडे तर आधारकार्ड नव्हते म्हणून त्याचे ऑपरेशन होत नव्हते. भगव्यावाल्यांचे वर आणि खाली दोन्हीकडे सरकार आहे तरी देखील भगव्यावाल्याचे ऑपरेशन होत नाही. यासाठी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करावे लागते, अशी टीका बच्चू कडू यांनी भाजपवर केली.

मेक इंडियात कांदा येत नाही का ? भाजप आमदारांसमोरच बच्चू कडू मोदींवर बरसले !

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube