राणा दाम्पत्य, यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी; आवार घाला थेट देवेंद्र फडणवीसांनाच सवाल !

  • Written By: Published:
राणा दाम्पत्य, यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी; आवार घाला थेट देवेंद्र फडणवीसांनाच सवाल !

Bachchu Kadu on Ravi Rana : एकमेंकावर सुरू असलेल्या आरोपांमुळे सध्या अमरावतीचे राजकारण जोरदार पेटले आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत पैसे घेतले असेल तर याबाबत निवडणूक आयोग, पोलिसांनी कारवाई करावी. असे असेल तर आपल्या जवळच्या असलेल्या राणा दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का अभय देत आहे, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

चौंडीतील उपोषणकर्त्यांकडे विखेंनी फिरवली पाठ, दखल न घेतल्याने धनगर आंदोलक संतप्त

अमरावतीमध्ये झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. परंतु काम दुसऱ्याचे केल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांनीही याबाबत शंभर कोटींचा अब्रुनुकसानीची दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. राणा यांनी पैसे वाटले असेल तर ईडी काय करत होती. उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रवी राणांना पाठिंबा होता, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.


NCP : पक्षसंघटनेत दुर्लक्ष, जिल्ह्यांकडेही फिरवली पाठ; अजितदादा, पटेलांनी मागितलं मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक

या वादावर बच्चू कडू म्हणाले, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे. अमरावती जिल्ह्याची परंपरा फार चांगली राहिली आहे. ही परंपरा चांगली ठेवण्याचे काम आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून उठ सूट सगळ्यांना टार्गेट करण्याचे काम राणा दांपत्याकडून सुरू आहे.

नवनीत राणा या यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोप करत असेल तर निवडणूक आयोग व पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मी स्वतः अमरावती पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. राणा दाम्पत्य हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. राणा दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय आहे का, त्यांच्यावर फडणवीसांनी आवार घालावा, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube