Video : फडणवीसांच्या पोटातलं ओठांवर आलचं; शिंदे अन् दादांचे अवगुण थेट सांगून टाकले

  • Written By: Published:
Video : फडणवीसांच्या पोटातलं ओठांवर आलचं; शिंदे अन् दादांचे अवगुण थेट सांगून टाकले

Devendra Fadnavis On Ajit Pawar & Eknath ShindeDisadvantages : राजकारणातले फडणवीसांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावलेल्या आहेत. तर, दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांद देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) फडणवीसांनी शिंगावर घेतले असून, फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही या विधानाबद्दल मला माफ करतील असेही फडणवीस म्हणाले. ते ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते जिंकले, हरले किंवा..”

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात फडणवीसांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगलं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देण्यापूर्वी फडणवीसांनी मी देत असलेल्या उत्तराबद्दल दादा आणि शिंदे दोघेही मला माफ करतील पण खरं सांगायचं तर संवादात हे दोन्ही  नेते चांगले नसल्याचे फडणवीसांना सांगितले. त्यामुळे पवारांबद्दलचा आदर आणि शिंदे, अजितदादांबद्दल असलेलं पोटातलं मतं ओठांवर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कोणता नेता चांगल्या पद्धतीने करतो? या प्रश्नावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीत स्वत:ला झोकून देण्याची आवड आहे. त्यामुळे मी त्यांचं नाव घेईन असे फडणवीस म्हणाले.

हात धुवून मागे लागा, अजितदादाचं तक्रार घेऊन आले पाहिजेत; शाहंच्या कानमंत्राने भुवया उंचावल्या

पालिका निवडणुकांमध्ये कोण सरस ठरेल? 

पुढे फडणवीसांना आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांबद्दल विचारण्यात आले. पालिका निवडणुकांमध्ये अजित पवार की एकनाथ शिंदेंपैकी कोण चांगलं काम करेल असे विचारले असता फडणवीसांना (Devendra Fadnavis) दोघांनाही बाजूला सारत थेट भाजपचं चांगली कामगिरी करेल असे छातीठोकपणे सांगितलं. त्यामुळे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या विधानावरूही मतमतांवर असल्याचे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली असून, याही निवडणुकांमध्ये जर भाजप नेहमीप्रमाणे मतांमध्ये मोठा भाऊ ठरला आणि फडणवीसांच्या उत्तराप्रमाणे भाजपने चांगली कामगिरी केली तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनेक पालिकांमध्ये महापौरपदाला मुकावे लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube