ठाकरेंना मोठा धक्का बसणार? सांगलीचा पैलवानच साथ सोडणार; पडद्यामागं काय घडतंय..

Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते, कट्टर शिवसैनिक, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. आताही आणखी एक धक्का सांगलीत बसण्याची चिन्हे आहेत. चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसे संकेत दिले आहेत.
सांगली येथील कार्यक्रमात चंद्रहार पाटील यांनी उदय सामंत यांची भेट घेतली होती. त्यांचा सत्कारही केला. यानंतर पाटील लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. चंद्रहार पाटील यांनी आमच्या गळ्यात हार घातला पण चंद्रहार पाटील यांच्या गळ्यात एकनाथ शिंदे कधी हार घालणार हे पाटील यांनीच ठरवावं असे सूचक वक्तव्य मंत्री सामंत यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत याच चंद्रहार पाटील यांच्यासाठी ठाकरेंनी काँग्रेस बरोबर वाद घातला होता.
या मतदारसंघात काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी सुद्धा झाले. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने आपली ताकद चंद्रहार पाटील यांच्या मागे उभी करणे गरजेचे होते. परंतु, तसे काही झाले नाही. या निवडणुकीत चंद्रहार पाटील पराभूत झाले होते. आता हेच पाटील ठाकरेंची साथ सोडून जाणार असल्याची परिस्थिती नि्र्माण झाली आहे. उदय सामंत यांच्याबरोबरील बैठकीने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी! नाशकात ठाकरेंचा माजी आमदार फोडला; भुजबळांनाही शह देणार?
नाशिकमध्ये ठाकरेंना धक्क्यांवर धक्के
राज्यात सध्या नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच आणखी एक माजी आमदाराने ठाकरेंची साथ सोडली. त्यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना या गळतीमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता याही निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत इनकमिंग वाढत चालली आहे.
Narayan Rane : उद्धव अन् राज ठाकरेंवर राणेंचा प्रहार; म्हणाले, ‘दोघे भाऊ एकत्र आले तरी..