Devendra Fadnavis : ‘काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही’; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis : ‘काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही’; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर ओबीसी नेते राज्य सरकावर प्रचंड चिडले आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी ओबीसी आरक्षणाचे नुकसान होऊ देणार नसल्याचे सांगत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

फडणवीस आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काहीही केलं तरी टीका होते. अर्धे लोक इकडे टीका करतात अर्धे लोक तिकडे टीका करतात. शेवटी राज्यातल्या सगळ्याच समाजाला न्याय द्यायचा आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्या मराठा समाजातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

Chhagan Bhujbal : ‘सरकारकडून आता हट्ट पुरवण्याचे काम सुरू’ भुजबळांची स्पष्ट शब्दांत नाराजी

ओबीसी समाजात कुणी वाटेकरी केला असे नाही. मराठा समाजाचा तो अधिकारच होता. प्रमाणपत्र मिळण्यात ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करून पद्धती आणखी सोपी करण्यात आली आहे. 100 टक्के ओबीसी समाजाचं आरक्षण (OBC Reservation) सुरक्षित केलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये असाच मार्ग काढण्यात आला आहे. काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भुजबळ-राणेंबरोबर चर्चा करणार  

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जे काही बोलत आहेत ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. यानंतर मी त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. सरकारने नेमके काय केले हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange : मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? यादीच आली समोर..

सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम – भुजबळ 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आम्ही ऐकतो पण आमच्या मनाचं समाधान होत नाही. हट्ट पुरवण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आरक्षण केले सारथीमध्ये पण तेच महाज्योतीतही तेच. कुठे तर क्लिअॅरिटी देणार आहात की नाही ओबीसी समाजात. ओबीसी समाजही मतदान करतो. हे सर्व हट्ट पुरवण्याचे काम सरकार करत आहे. कुणावरही अन्याय होणार नाही असं म्हणत आहेत पण आता तर 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे धक्का लागणारच आहे, असे भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज