दावोस दौऱ्यातून CM एकनाथ शिंदेंचं गुंतवणूकदारांना साकडं, म्हणाले, ‘भारताच्या विकासगाथेत….’

  • Written By: Published:
दावोस दौऱ्यातून CM एकनाथ शिंदेंचं गुंतवणूकदारांना साकडं, म्हणाले, ‘भारताच्या विकासगाथेत….’

मुंबई : महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही (Mumbai) कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये (Davos)  जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपले विचार मांडत होते.

विवेक रामास्वामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हे तर उपराष्ट्रपती होणार! ट्रम्प यांच्यासमोरच घोषणा 

गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला गती देणार
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातल्या अनेक भागात तंत्रज्ञानाच्या जोरावर नाविन्यता जिल्हे (इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट) पुढे आले आहेत, त्यामुळे त्या परिसरात जोरदार आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. नाविन्यपूर्ण उद्योग, व्यवसाय, संशोधन संस्था आणि उद्योजकतेची वाढ ही या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानाचे आदानप्रदान आणि तंत्रज्ञानाचा विकास करणारी इकोसिस्टीम या जिल्ह्यांनी तयार केली असून महाराष्ट्रात देखील अशाच स्वरुपाची इकोसिस्टीम घडविण्यावर भर देण्यात येईल.

मुंबईच्या माध्यमातून गुंतवणूक करा
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत स्टार्टअप आणि व्हेंचर कॅपिटल, संशोधन संस्थांसाठी लवचिक अशी इको सिस्टीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नेहमीच मार्गदर्शन आणि प्राधान्य आहे. नीती आयोगाने देखील तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसाठी मुंबईला एक आघाडीचे शहरी केंद्र म्हणून निवडले आहे. आपण सर्वांनी मुंबईच्या माध्यमातून भारताच्या विकासगाथेत सहभागी व्हावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

रोहितची टॉसची हॅट्रिक, प्रथम फलंदाजीचा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल 

समृद्धी महामार्गामुळे विकासाची संकल्पना साकार
नवीन शहरे आणि नागरी केंद्रे स्थापन करून स्थानिक पातळीवर शाश्वत आर्थिक विकास होणे आवश्यक आहे यावर भर देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही निर्माण केलेला मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख क्षेत्रांना जोडण्यासाठी 700 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गा या महामार्गालगत आम्ही औद्योगिक टाउनशिप उभारत आहोत. शहरी विकासाची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार करणारा हा पहिलाच महामार्ग असेल.

क्लस्टर विकासातून घरे
स्थानिक पातळीवरील सरकारी यंत्रणा केवळ नागरिकांना सुविधा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत नाही, तर राष्ट्रीय आणि स्थानिक धोरणांच्या अंमलबजावणीतील अडथळे आणि आव्हाने ओळखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. गाव आणि शहरांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात स्थानिक शासकयी संस्थाची महत्वाची भूमिका असते. मुख्यमंत्र्यांनी आपले उदाहरण देत सांगितले की, कोयना धरणाच्या बांधकामामुळे माझे स्वतःचे कुटुंब मुंबईपासून 300 किमी दूर विस्थापित होऊन ठाण्यासारख्या ठिकाणी आले. त्यावेळी येथील लोकांना झोपड्यांमध्ये राहावे लागत होते, अनेकांना स्वतःचे घर नव्हते. आता आम्ही नाविन्यपूर्ण क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 30 हजार बेघर झोपडपट्टीवासीयांना घरे देत आहोत, एवढेच नाही तर अतिरिक्त चटई क्षेत्राचा उपयोग उद्याने, प्रमुख रस्ते इत्यादी सुविधा देण्यासाठी केला जाणार आहे.

जमिनीचा सुयोग्य वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत विकास करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले असून सर्वाधिक शहरीकरण आणि सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेल्या महाराष्ट्राचे यात १ ट्रिलियन डॉलर इतके मोठे योगदान असणार आहे असं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून विशेषत: मुंबई आणि ठाणे परिसरात निवासी घरांची कमतरता हे आपल्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. जमिनीची मर्यादा लक्षात घेऊन आम्ही उपलब्ध जमिनीचा सुयोग्य वापर करण्यासाठी नाविन्यपूर्ण पाउले उचलली आहेत. एक वेगळी भूमिका घेऊन झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन आम्ही सुरु केले आहे. एकेकाळची आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे रूप आम्ही बदलवून टाकत आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube