‘मी वाट बघतोय…’ राज ठाकरेंनी दिलं निमंत्रण, सोशल मिडिया पोस्ट चर्चेत

MNS Book Exhibition On 27 February In Mumbai : 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. या निमित्ताने मनसे मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 27 फेब्रुवारीला एक भव्य पुस्तक प्रदर्शन (MNS Book Exhibition) भरवत आहे. सोशल मिडिया पोस्ट करत खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) ही माहिती दिलीय.
सस्नेह जय महाराष्ट्र,
येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित… pic.twitter.com/vAiLZEapXX
— Raj Thackeray (@RajThackeray) February 21, 2025
सोशल मिडिया पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की, येत्या 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे 2 मार्च 2025 पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत (Raj Thackeray News) आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची खात्री असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
“सुशांतसिंह राजपुतचा आत्मा आमच्याकडे येतोय, कुणीतरी त्याच्यावर..”, डॉक्टराच्या दाव्याने खळबळ!
या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी, असा विचार डोक्यात आला. जवळपास 17 मान्यवरांशी मी बोललो. प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आणि आपली शक्तीपण आहे, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
शरद पवारांकडून राऊतांना दिलासा, तिखट टीकेनंतरही पवार म्हणाले, “त्यांना मत मांडण्याचा..”
या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे, हे पुढच्या पिढ्यांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय? हे कळत नाही. मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे, पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील.
मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.