तृणमूल काँग्रेसने बंगालला गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला बनवलं; अमित शाहांची ममता बॅनर्जींवर टीका

तृणमूल काँग्रेसने बंगालला गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला बनवलं; अमित शाहांची ममता बॅनर्जींवर टीका

Amit Shah Criticized Trinamool Congress And Mamata Banerjee : प्रथम कम्युनिस्टांनी आणि नंतर तृणमूल काँग्रेसने ( Trinamool Congress And Mamata Banerjee) बंगालला गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील हिंसाचाराचा बालेकिल्ला बनवले, असा आरोप देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी कोलकाता येथे झालेल्या भाजपच्या ‘विजय संकल्प कामगार परिषदेत’पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) वर जोरदार हल्लाबोल केला.

भाजप बंगालमध्ये सरकार स्थापन करणार

बंगाल हे बेकायदेशीर घुसखोरांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले होते. आता ममता दीदींचा काळ संपला आहे. 2026 च्या निवडणुकीत भाजप बंगालमध्ये सरकार स्थापन करेल, असं देखील यावेळी आश्वासन अमित शाह यांनी (Kolkata) दिलं आहे.

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको…किमान 10 जूनपर्यंत पावसात घट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना अमित शाह म्हणाले की, ‘पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारणाऱ्यांना उत्तर देणे योग्य नव्हते का? ममता यांना ऑपरेशन सिंदूर आवडले नाही, कारण त्या तुष्टीकरणाचे राजकारण करतात. ममतांनी ऑपरेशन सिंदूरला उघडपणे विरोध केला नाही, परंतु देशातील महिलांच्या भावनांशी खेळले, असा आरोप ममता बॅनर्जी यानी केलाय.

राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक 

आता बंगालच्या महिला ममता दीदींना सिंदूरचे महत्त्व समजावून सांगतील, असं म्हणत शाहांनी भाजप कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले. 2026 ची निवडणूक ही केवळ बंगालची निवडणूक नाही, तर ती राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक आहे. ममता सरकारने सीमा खुली ठेवली आहे आणि घुसखोरांना मोकळीक दिली आहे.’

पुन्हा कोरोनाचा कहर! देशात रुग्णांची संख्या 3700 च्या पुढे; आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू

केंद्र सरकारने बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी राज्याकडून जमीन मागितली होती, परंतु ममता सरकारने व्होट बँकेच्या भीतीने ती थांबवली, असा आरोपही अमित शहा यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये सरकारी नोकऱ्या उघडपणे विकल्या जात आहेत. ही प्रवृत्ती आता थांबली पाहिजे. 2026 मध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर ममता सरकारच्या काळात ज्या भाजप कार्यकर्त्यांवर अत्याचार झाले त्यांना न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 40% मते मिळाली होती. आता आपल्याला फक्त काही टक्के मते वाढवायची आहेत, आपण सरकार स्थापन करू. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या विकासासाठी आणि संस्कृतीसाठी काम केले आहे. भाजपला गोळीचं उत्तर गोळीने कसं द्यायचं,  हे माहित आहे असं देखील शाह यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube