इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, असा समाज निर्माण होईल, भाषा वादात अमित शहांचे मोठे विधान

इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, असा समाज निर्माण होईल, भाषा वादात अमित शहांचे मोठे विधान

Amit Shah On English Language : भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. असं एका कार्यक्रमात बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले. तसेच मूळ भाषांमध्ये अभिमानाने जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आता आली आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. गृहमंत्री शाह आज माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री (Ashutosh Agnihotri) यांनी लिहिलेल्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना भारताने वसाहतवादी प्रभावाचे अवशेष सोडून द्यावेत आणि अभिमानाने स्वतःच्या भाषा स्वीकारल्या पाहिजेत. असं म्हटले आहे.

पुढे या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या देशात, इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. केवळ दृढनिश्चयी लोकच बदल घडवून आणू शकतात. माझा विश्वास आहे की आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत. आपल्या भाषांशिवाय आपण खरे भारतीय नाही. आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपला धर्म समजून घेण्यासाठी कोणतीही परदेशी भाषा पुरेशी असू शकत नाही.

अर्धवट भाजलेल्या परदेशी भाषांमधून पूर्ण भारताची कल्पना करता येत नाही. ही लढाई किती कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय समाज ही लढाई जिंकेल. असं अमित शाह म्हणाले.

पंतप्रधानांचे पंच प्राण

तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या पंच प्राणाचा देखील उल्लेख केला. विकसित भारताचे ध्येय साध्य करणे, गुलामगिरीच्या प्रत्येक विचारापासून मुक्त होणे, वारसा, एकता आणि एकतेचा अभिमान बाळगणे, प्रत्येक नागरिकात कर्तव्याची भावना जागृत करणे. हे पाच प्रतिज्ञा देशातील नागरिकांचे संकल्प बनले आहेत. 2024 च्या विकसित भारताच्या प्रवासात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील. असं अमित शाह म्हणाले.

गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित! विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube