अक्षर-कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण; दणदणीत विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये

अक्षर-कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण; दणदणीत विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये

IND vs ENG Semi Final : भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोरदा धडक मारलीय. इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत भारताने हा लखलखीत विजय मिळवला. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकीपटू जोडीच्यापुढे इंग्लंडचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. या दोघांनीही प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. (T20 World Cup) याशिवाय भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माचीही मोठी भूमिका राहीली. (IND vs ENG) रोहितने अर्धशतकी खेळी करत आपलं जोरदार प्रदर्शनही कायम ठेवलं. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. भारताने १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता दक्षिण आफ्रिकेशी फायनल सामना होणार आहे.

गावस्कर, सचिनला जे जमलं नाही ते रोहित शर्माने करून दाखवलं, खास विक्रमांवर कोरलं नाव

एकतर्फी विजय मिळवला

इंग्लंडला भारताने सर्वबाद करत टी-२० विश्वचषक २०२२ मधील उपांत्य फेरीतील १० विकेट्सच्या पराभवाचा व्याजासकट बदला घेतलाय. २०२२ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं होते. त्यानंतर भारतीय संघानेही इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवत आपला बदला पूर्ण केलाय.

तिथेच विजय निश्चित

बटलरने संघाला भारताने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करून दिली. बटलरने अर्शदीपच्या तिसऱ्या षटकात ३ चौकार लगावत भारताला धक्का दिला होता. मात्र, रोहित शर्माने फिरकीपटूला साजेशा खेळपट्टीवर स्पिन अटॅक सुरू केला. अक्षर पटेलला चौथं षटक देण्यात आलं आणि त्याने पहिल्याच चेंडूवर बटलरला बाद करत मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर बुमराहने पुढच्या षटकात भेदक गोलंदाजी करत फिल सॉल्टला क्लीन बोल्ड केलं तिथच भारताने विजय निश्चित केला होता.

खातेही न खोलता परत

पुढच्या षटकात अक्षरने पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड करत खातेही उघडू न देता माघारी धाडलं. यानंतर पुन्हा एकदा आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला पंतने झटपट स्टंपिंग करत बाद केलं. अक्षरनंतर फिरकी विभागाकडून विकेटस घेण्याची जबाबदारी कुलदीपने घेतली आणि नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅम करनला पायचीत केलं. त्यानंतर सर्वाधिक धावा कपत मैदानात असलेल्या हॅरी ब्रुकला क्लीन बोल्ड करत भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानंतर जॉर्डनला पायचीत करत सातवी विकेट मिळवून दिली. तर अक्षरच्या षटकात कुलदीप आणि अक्षरने मिळून लिव्हिंगस्टोनला धावबाद केलं.

बुमराहने २ विकेट्स मिळवल्या

दरम्यान, हार्दिक पंड्याच्या षटकात सूर्यकुमार शानदार फिल्डिंग करत आदिल रशीदला धावबाद केलं तर बुमरहाने १७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरला पायचीत करत संघाला ६८ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. भारताकडून अक्षर पटेलने ४ षटकांत २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या तर कुलदीपने ४ षटकांत १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर बुमराहने २ विकेट्स मिळवल्या. तर दोन खेळाडू धावबाद झाले.

रवींद्र जडेजा नाबाद भारत जोडोनंतर आता आषाढी वारी? राहुल गांधी करणार विठू नामाचा गजर

भारत इंग्लंडमधील सेमीफायनलची नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. यादरम्यान रोहिच शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या. तर, सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत४७ धावांचं योगदान दिलं. हार्दिक पांड्यानेही १३ चेंडूत २३ धावा केल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजाने १७ धावांची नाबाद खेळी केली. अक्षर पटेलही १० धावा करून नाबाद राहिला. अक्षर पटेलच्या अखेरच्या षटकातील एका षटकाराने भारत १७१ धावांपर्यंत मजल मारू शकला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज