Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

Karnataka : कर्नाटक या काँग्रेसशासित राज्यात सध्या वेगवान (Karnataka) घडामोडी घडू लागल्या आहेत. येथे भाजपाच्या ऑपरेशन लोटसची चिंता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना सतावत असतानाच काँग्रेसअंतर्गतही धुसफूस वाढू लागली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची खु्र्ची धोक्यात असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. यानंतर आता आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (DK Shivkumar) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांची गुप्त भेट घेत चर्चा केली. यानंतर लगेचच शिवकुमार दिल्लीला रवाना झाले. या गुप्त भेटीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

क्रिसेंट रोडवरील जारकीहोळी यांच्या सरकारी निवासस्थाही ही बैठक झाली. जारकीहोळी यांनी याआधी बेळगावात शिवकुमार यांच्या हस्तक्षेपाबद्दल आक्षेप व्यक्त केला होता. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना शिवकुमार यांच्याकडून जास्त महत्व दिले जास्त महत्व दिले जात असल्याने जारकीहोळी नाराज झाले होते. बेळगावात आलेल्या शिवकुमार यांच्या स्वागतापासून दूर राहत त्यांनी आपली नाराजी दाखवून दिली होती.

Karnataka Politics : काँग्रेसचं सरकार पडणार, 50 आमदार भाजपाच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, की पक्ष संघटना, लोकसभा निवडणूक आणि जिल्हाध्यक्ष बदलाबाबत चर्चा झाली. एक दिवस आधी मंत्री जारकीहोळी म्हणाले होते की दलितांसह सर्व समाजाकडून मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी होत आहे मात्र, काँग्रेस हायकमांडला यावर निर्णय घ्यावा लागेल.

2013 मध्ये दलित मुख्यमंत्र्यांची मागणी होती. 2008 मध्ये सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांना संधी मिळाली नाही. गृहमंत्री जी. परमेश्वर आठ वर्षे पक्षाचे अध्यक्ष होते आणि उपमुख्यमंत्री झाले परंतु,त्यांनाही मुख्यमंत्री होता आले नाही. पक्ष आणि सरकारमधील काही घडामोडींवर नाराज असलेले सतीश जारकीहोळी यांनी 50 माजी आणि विद्यमान आमदारांसह दुबईच्या सहलीचा प्लॅन आखला होता. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी यात हस्तक्षेप केल्याने तो पूर्णत्वास आला नाही.

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं

पाच महिन्यांपूर्वीच्या घटनेची आठवण 

दरम्यान, कर्नाटकात याआधी चार महिन्यांपूर्वी एक राजकीय नाट्य घडले होते. राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकूण 20 मंत्री आपली कामे नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले गेले होते. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी पत्रात म्हंटले होते की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. ते सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण होणार नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube