माय-लेकींचा प्रियकर एकच, लग्नानंतर महिन्याभरातच काढला नवऱ्याचा काटा

Telangana Crime News : राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. सोनम रघुवंशीने ज्या पद्धतीने राजाला संपवलं त्याने सारेच हादरले आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. एका नवविवाहितेने आपल्या लग्नाच्या एका महिन्याच्या आतच पतीची हत्या केली. पतीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तेलंगणातील कुरनूल (Kurnool) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Prakash Ambedkar Petition : शेवटच्या टप्प्यातील 76 लाख मतांचा उलगडा? २५ जूनपर्यंत सस्पेंन्स
या प्रकरणातील मुख्य आरोपी मृताची पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता आहेत. दोघींचेही एका बँक कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मात्र, ही घटना घडल्यापासून तो फरार आहे.
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत तेजेश्वरच्या कुटुंबियांनी १३ फेब्रुवारी रोजी कुरनूल येथील ऐश्वर्या नावाच्या मुलीशी त्याचे लग्न ठरवले होते. मात्र, या लग्नाच्या पाच दिवस आधी नववधू ऐश्वर्या फरार झाली होती. कुरनूल येथील एका बँक कर्मचाऱ्यासोबत ती पळून गेल्याची कुजबूज सुरू होती. ही घटना तेजेश्वर आणि त्याच्या कुटुंबालाही कळाही होती. त्यानंतर कसेबसे ऐश्वर्याने तेजेश्वरला ती त्याच्यावरच प्रेम करत असल्याची खात्री करुन दिली. आणि १८ मे रोजी दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्यांच्या संसारात अडचणी येऊ लागल्या. ऐश्वर्या तासनतास कोणाशी तरी बोलत असल्याचं तेजेश्वरच्या लक्षात आल. अखेर १७ जून रोजी तेजेश्वर अचानक गायब झाला.
Prakash Ambedkar Petition : शेवटच्या टप्प्यातील 76 लाख मतांचा उलगडा? २५ जूनपर्यंत सस्पेंन्स
तेजेश्वरचा कुठेच पत्ता लागत नसल्यानं त्याच्या भावाने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांच्यासमोर जे आलं त्याने पोलिसही चक्रावून गेले. चौकशीदरम्यान ऐश्वर्या आणि तिच्या आईने आपले एका बँक कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली. सुजाता हिचे त्या बँक कर्मचाऱ्यासोबत दीर्घकाळापासून संबंध होते. तर नंतर ऐश्वर्याही त्याच्यासोबत संबंध ठेवू लगली. त्यांचा कॉल डेटा तपासला असता ऐश्वर्याने लग्नानंतर तब्बल दोन हजार वेळा बँक कर्मचाऱ्याशी संवाद साधल्याचं उघड झालं.
दरम्यान, ऐश्वर्या, तिची आई सुजाता आणि त्यांच्या प्रियकराने तेजेश्वरच्या हत्येचा कट रचला. फरार बँक कर्मचाऱ्याने तेजेश्वरला ठार मारण्यासाठी आरोपींना सुपारी दिली होती. त्याने त्यांच्यासोबत त्याचा ड्रायव्हरही पाठवला होता. सुपारी किलर्सने तेजेश्वरला १० एकर जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. तेजेश्वर गाडीत बसताच आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या हत्येप्रकरणी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांना अटक केली आहे. तर हत्येत सहभागी असलेल्या बँक कर्मचाऱ्यांचा आणि इतर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.