‘ऑपरेशन हनीमून’: अखेर सोनमनं बेवफा असल्याचं कबूल केलंच…असा झाला राजा रघुवंशीचा घात

‘ऑपरेशन हनीमून’: अखेर सोनमनं बेवफा असल्याचं कबूल केलंच…असा झाला राजा रघुवंशीचा घात

Sonam Raghuvanshi Confesses Husbands Murder: प्रेम… जिथे विश्वास असतो, तिथेच फसवणुकीची सावलीही असते… जिथे हसणं असतं, तिथेच अश्रू दाटलेले असतात… आणि जिथे आयुष्य देण्याचं वचन असतं, तिथे कधी कधी मृत्यूचं दान मिळतं. ही अशाच एका भयाण हत्याकांडाची कहाणी… ज्यात प्रेम, कटकारस्थान, लोभ आणि विश्वासघात यांनी हातमिळवणी केलीये – राजा रघुवंशी हत्याकांड!

राजा रघुवंशी… आपलं आयुष्य समाधानाने जगणारा तरुण. व्यवसायाने कंस्ट्रक्शन कंपनीचा मालक होता. ११ मे २०२५ रोजी राजा आणि सोनम यांचं लग्न इंदौरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. राजा हा इंदौरच्या “रघुवंशी ट्रान्सपोर्ट”चे मालक असणाऱ्या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा होता तर सोनम तिच्या वडिलांच्या प्लायवुड व्यवसायात सक्रिय होती.

तळीरामांची क्वाटर महागली… लाडक्या बहिणींसाठी भाऊजींच्या खिशाला चाट!

लग्नानंतर ९ दिवसांनी, २० मे रोजी दोघं हनिमूनसाठी मेघालयला गेले. सुरुवातीला कामाख्या मंदिर जाण्याचं ठरलं होतं पण अचानक सोनमने शिलाँगला जाण्याचा निर्णय घेतला. २३ मे रोजी ते दोघं चेरापुंजीजवळ मावलाखियात गावातील डबल डेकर ब्रिज पाहायला गेले आणि त्यानंतर बेपत्ता झाले. त्यांची स्कूटर रस्त्यावर बेवारस सापडली.
२ जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह वेई सावडोंग धबधब्याजवळ सापडला. पोस्टमॉर्टेममध्ये डोक्यावर गंभीर मार आणि धारदार शस्त्राचे वार दिसून आले. दरम्यान सोनम गायब होती आणि तिच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

८ जून रोजी सोनम उत्तर प्रदेशात गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. तिथून तिने भावाला फोन केल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सोनमवर त्यांना संशय यायला लागला. खोलवर तपास केल्यानंतर यात अजून एकाचं नाव समोर आलं… ते म्हणजे राज कुशवाहा. सोनमचा प्रियकर… तो सोनमच्या भावाच्या प्लायवुड कारखान्यात आधी काम करत होता.  तपासात हे ही समोर आलं की, सोनम आणि राज कुशवाहा यांचं प्रेमप्रकरण आधीपासूनच सुरू होतं. काही नातेवाईकांच्या मते सोनमच्या कुटुंबीयांना या नात्याची माहिती होती. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सोनम आणि राजा रघुवंशीचं लग्न लावून दिलं.

FYJC म्हणजेच ११वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मेरिट लिस्ट जाहीर

पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाह यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. 42 सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जाकीट, सोनमचा रेनकोट आणि इतर पुरावे समोर ठेवले. पुरावे पाहिल्यानंतर सोनमनं कबुल केलं की तिने प्रियकर राज कुशवाह आणि तीन सुपारी किलर… आकाश राजपूत, विशाल उर्फ विक्की ठाकूर आणि आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता.

२३ मे या दिवशी डबल डेकर ब्रिजवरून परतताना, राजा रघुवंशीला सोनमनं वेई सावडोंग धबधब्याजवळ नेलं. इथंच सोनमचे प्रियकर व साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी थेट डोक्यावर लोखंडी रॉडने पहिला जोरदार वार केला. यामुळे राजा जागेवरच बेशुद्ध झाला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या छाती आणि पाठीवर वार करण्यात आले. त्यानंतर अपघात दाखवण्यासाठी त्यांनी त्याचा निष्प्राण देह खोल दरीत फेकून दिला.

पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

सोनमनं आपल्या सासूला सांगितलं होतं की, ती अपरा एकादशीचं व्रत करत आहे, मात्र तपासात हॉटेलच्या रेकॉर्डवरून दिसून आलं की तिनं जेवण केलं होतं. हत्येनंतर सोनमनं राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘सात जन्मों का साथ है’ अशी पोस्ट करून तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. खून केल्यानंतर सोनमने घटनास्थळीच काही काळ थांबून आपले साथीदार मेघालयातून बाहेर गेल्याची खात्री केली. नंतर ती स्वतः बंगालमार्गे उत्तर प्रदेशात पोहोचली, जिथे ती ८ जून रोजी गाझीपूरमधील ढाब्यावर पोलिसांच्या हाती लागली.

मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचा उद्देश हा राजाला वाटेतून बाजूला करून राज कुशवाहसोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा होता. राजाचे भाऊ सचिन आणि वडील अशोक रघुवंशी यांनी सोनमला फाशीची शिक्षा आणि तिच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्काराची मागणी केली आहे. सोनमचा भाऊ गोविंदनेही मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता हा फक्त एका व्यक्तीचा खून नसून तो विश्वास, प्रेम, आणि नव्या आयुष्याच्या स्वप्नांचा खून होता, असं म्हणता येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube