नवविवाहित लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालायं.
राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
Pahalgam Terror Attack : मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. सहा त सात दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचल्याची […]
पुण्यातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात बळी गेला. तसेच काही पर्यटक अजूनही तेथे अडकले आहेत. या सर्वांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील हॉटेलमालकाने थांबवल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला असल्याचं बुलढाण्याच्या जैन कुटुंबाने व्हिडिओ शेअर करीत सांगितलं.
मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही निवेदनात म्हटलं आहे.