भारतापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशचे आनंदी लोक

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (3)

नवी दिल्ली : वर्ल्ड हैप्पीनेस डेनिमित्त (World Happiness Day) वार्षिक हैप्पीनेस अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 137 देशांच्या यादीत भारत 125 व्या स्थानावर आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान (108), म्यानमार (72), नेपाळ (78), बांगलादेश (102) आणि चीन (64) या यादीत भारतापेक्षा वर आहेत. अहवालात फिनलंडला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून संबोधण्यात आले आहे. त्याला सलग सहाव्यांदा पहिले स्थान मिळाले आहे.

या यादीत अफगाणिस्तानला 137 वे स्थान मिळाले आहे. अहवालानुसार तिथले लोक सर्वाधिक नाखूष आहेत. सर्वात कमी आनंदी देशांच्या यादीतील इतर देश आहेत- लेबनॉन, झिम्बाब्वे, द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो इ. या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आणि लोकांचे आयुर्मान सर्वात कमी आहे.

पंतप्रधानांनी लुटला पाणीपुरीचा आनंद

हा अहवाल यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने जारी केला आहे. 150 हून अधिक देशांतील लोकांवर केलेल्या जागतिक सर्वेक्षण डेटाच्या आधारे हे तयार करण्यात आले आहे. यामध्ये दरडोई जीडीपी, सामाजिक आधार, आयुर्मान, स्वातंत्र्य, भ्रष्टाचार आणि औदार्य या घटकांवर विशेष लक्ष दिले जाते.

गेल्या एक वर्षापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. तरीही हॅपीनेस इंडेक्समध्ये त्यांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे. रशियाला 70 व्या तर युक्रेनला 92 व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही भारत या यादीत अगदी तळाशी आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या देशांच्या तुलनेत भारत खाली का आहे, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.

Tags

follow us