“जोधाबाईशी नाही तर दासीच्या मुलीशी झाला होता अकबराचा विवाह”, राजस्थानचे राज्यपाल बागडेंचा दावा

Jodha Akbar Marriage Story : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. ब्रिटिश इतिहासकारांच्या प्रभावामुळे भारतीय इतिहासात अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश झाला. यात जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या विवाहाची कथाही आहे. अकबराचं जीवनचरित्र अकबरनामा मध्ये जोधा आणि अकबर यांच्या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही असा दावा राज्यपाल बागडे यांनी केला.
बुधवारी उदयपूर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना बागडे म्हणाले, असं म्हटलं जातं की जोधा आणि अकबर यांचा विवाह झाला होता. त्यावर चित्रपटही आला. इतकेच नाही तर त्यावर पुस्तकांतही लिखाण झालं. पण हे सगळं खोटं आहे. अकबरनामात तर या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. आमेरचे शासक भारमल यांनी आपल्या दासीच्या मुलीचा विवाह अकबरशी केला होता. बागडे यांच्या या वक्तव्याने 1569 मधील मुघल सम्राट अकबर आणि आमेरचे राजे भारमल यांची मुलगी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक विवाहावर नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
AI नोकरी घेणार नाही वाचवणार! ‘या’ 9 सेक्टर्सना जास्त धोका, स्वतः अपस्किल व्हा अन् जॉब सेफ करा
बागडे पुढे म्हणाले, ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय शूरवीरांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं लिहिला. दुर्दैवाने त्यांनी लिहिलेला इतिहासच अनेक वर्षे खरा मानला गेला. ज्या भारतीयांनी इतिहास लिहिला ते देखील इंग्रजांच्या दृष्टीकोनातून प्रभावित होते. महाराणा प्रताप यांनी अकबराला संधी प्रस्ताव पाठवल्याचा दावा देखील असाच भ्रामक आहे. महाराणा प्रताप यांनी त्यांच्या आत्मसन्मानाशी कधीच तडजोड केली नाही. इतिहासात अकबरच्या बाबतीत जास्त आणि महाराणा प्रताप यांच्या बाबतीत खूप कमी शिकवलं गेलं असे राज्यपाल बागडे म्हणाले.
केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपली संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला खरी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यपालांनी भारत पाकिस्तान (India Pakistan) सीमेवरील ग्रामीण भागातील नागरिकांच्या देशभक्तीचं कौतुक केलं आणि हेच खरे भारताचे प्रतीक असल्याचे सांगितले.
टेन्शनचं संपलं राव! WhatsApp वर येणार ‘Log Out’ फीचर; सतत येणाऱ्या मेसेजमधून मिळणार ‘ब्रेक’