हॅलो, मी बॅंकेतून बोलतोयं…फोन खरा की खोटा? TRAI कडून नवीन नियम लागू, जाणून घ्या कोणता?
बॅंकेतून बोलतोयं, सांगून फसवणूक होत असल्याने या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून नवीन नियम लागू करण्यात आलायं.
TRAI : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी (TRAI) एक नवीन नियम लागू केलायं. आता देशातील मोठ्या बॅंका, म्युचुअल फंड कंपनी, शेअर मार्केटशी संबंधित संस्था आणि पेन्शनरांना फोनकॉल्ससाठी ‘1600’ पासून सुरु होणाऱ्या नंबरचाच वापर करणार आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार, बॅंकेतून बोलत असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फसवणूक करणाऱ्यांपासून संरक्षण मिळणार आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव, पहलगाम हल्ला ‘बंडखोरीचा हल्ला’; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल
या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असून त्यांना फोन खरंच बॅंकेतून आलायं की नाही? हे तपासता येणार आहे. सध्या, 10 अंकी मोबाईल नंबरवरुन फोन करुन ओटीपी, युपीआय पीनसारखी माहिती घेत फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने या गुन्ह्यांची दखल घेत 1600 नंबरच्या सीरीजची सुरुवात केली आहे. 1600 नंबरपासून सुरु होत असलेल्या नंबरवरुनच आता संस्थांमधून सर्वसामान्यांना फोन येणार आहेत.
देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, सर्व कारभार अमित शाह चालवतात; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
म्युच्यूअल फंड आणि इतर कंपन्यांना 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतच 1600 नंबर घेणे बंधनकारक असणार आहे. कारण 15 मार्च 2026 पासून 1600 नंबरची सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासोबतच मोठ्या बॅंका किंवा इतर संस्थांना 1 जानेवारी 2026 पासून 1600 नंबरच्या सिरीजचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत एनबीएफसी आणि इतर पेमेंट बॅंका सहभागी होणार आहे. पेन्शनशी संबंधित संस्थांनाही 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 1600 सिरीजच्या नंबर वापरणे बंधनकारक असणार आहे.
बीडमधील धक्कादायक घोटाळा! भूसंपादनात २४१ कोटींचा घोळ, दहा जणांविरोधात गुन्हा
दरम्यान, आता यापुढे 1600 नंबरची सिरीज असलेल्या नंबरवरुन फोन आल्यास तोच फोन कॉल वित्तीय संस्थांकडून आला आहे, असं मानलं जाणार आहे. भारतीय दूरसंचार प्राधिकणाकडून सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतलायं. त्यामुळे आता फसवणूकीला आळा घालण्यास मदत होणार आहे.
