ग्रामपंचायत निवडणूक : श्रीगोंद्यात ‘हे’ चौघे झाले विजयी

ग्रामपंचायत निवडणूक : श्रीगोंद्यात ‘हे’ चौघे झाले विजयी

अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहे.

निकाल पुढीलप्रमाणे
श्रीगोंदा : माठ – सरपंच- अरुण विश्वनाथ पवार- ३९५ मतांनी विजयी.
थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी.
चवरसांगवी- सरपंच- सुनिता माळशिकारे- १७ मतांनी विजयी.
तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र – ७ मतांनी विजयी.

दरम्यान रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज निकाल हाती येणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर राजकिय गणिते पुर्णपणे बदलेली असून या निवडणुकीत ‘लोकनियुक्त सरपंच’ पदाची निवडप्रक्रिया कोणाच्या पथ्यावर पडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत आज धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube