पवारांचा विरोध असताना रोहित पवार आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

पवारांचा विरोध असताना रोहित पवार आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

Ajit Pawar On Rohit Pawar : महायुतीकडून (Mahayuti) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)  प्रचाराची सुरुवात झाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला.

अजित पवार यांनी या सभेत लोकांना बारामतीच्या विकासासाठी भावनिक होऊन मतदान न करण्याचा आणि आपल्या विचारांचा खासदार निवडण्याचे आवाहन मतदारांना केला.

आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, 2017 मध्ये राजेंद्र पवार यांनी रोहित पवार यांच्यासाठी माझ्याकडे जिल्हा परिषदेसाठी तिकीट मागितले होते,मी त्यांची ही मागणी साहेबांना कळवली. मात्र तेव्हा साहेबांनी स्पष्ट शब्दात नकार देत राजकारणात कोणी यायचे नाही, आपला बारामती अग्रो सांभाळा असं  म्हणाले होते. मात्र राजेंद्र पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित अपक्ष फॉर्म भरणार असल्याचे मला सांगितले. त्यावेळी पक्षाचा एबी फॉर्म माझ्याकडे असल्याने मी तो साहेबांना न सांगता रोहितला दिला होता.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत रोहितने मला खडकवासला येथून उमेदवारी द्या असे सांगितले. मात्र कर्जत- जामखेड मतदारसंघात माझे काम चांगले असल्याने मी त्याला कर्जत- जामखेडसाठी प्रयत्न कर म्हणालो. त्यापूर्वी हडपसरमधून देखील रोहितने तिकीट मागितले होते, माझे सासरे तिथे असल्याने मला मदत होईल असे तो म्हणाला होता आणि आता हीच मंडळी साहेबांच्या जवळ बसून माझ्यावर टीका करत आहेत, असा शब्दात अजित पवारांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. जर सगळं काही साहेबांनी केल, मग गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं? असा सवाल विचारात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या मागील टीकेला उत्तर दिला.

सगळं त्यांनी केलं तर आम्ही 35 वर्षात काय केलं? अजित पवारांचा पुतण्याला टोला

शरद पवार यांच्यावर टीका करत अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासबोत दिल्लीला जातो, आम्ही तिकडे गेल्यानंतर माझी मोदींजींसोबत ओळख झाली. तसेच अदानी – अंबानी यांच्यासबोत ओळख झाली मात्र यापूर्वी आमची त्यांच्यासबोत ओळख नव्हती आम्ही फक्त घास घास घासाचयं, पण मोठी लोकं यायची अन् ह्यांनी केलं, ह्यांनी केल.. असं व्हायच आणि ते निघूनही जायच, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. आता अजित पवार यांच्या या टीकेला शरद पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिला जातो हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज