भाजपला माणसांची नाही पैशांची गरज; बंडखोर पुतण्याला पाठिंबा देत कुकडेंचा घरचा आहेर
MP Madhukar Kukade यांच्या पुतण्याला उमेदवारी न दिल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
BJP needs money, not people; Former MP Madhukar Kukade Criticize BJP by supporting his rebel nephew : भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी भाजपमदील वाद चव्हाट्यावर आला आहे. कारण याठिकाणी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार मधुकर कुकडे यांचे पुतणे आशिष कुकडे यांनी बंडखोरी केली आहे. यावर आता कुकडे यांनी प्रतिक्रीया देताना नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
काय म्हणाले मधुकर कुकडे?
पुतण्याला उमेदवारी न दिल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना कुकडे म्हणाले की, आपण 15 वर्ष आमदार राहिलो मात्र कधीही पैसे पाहुन उमेदवारी दिलेली नाही. आता भाजपला मानसांपेक्षा पैशांची गरज आहे. पुतण्याला ऐनवेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे. तसेच बंडखोरी केलेल्या पुतण्या अशिष कुकडेंना त्यांनी पाठिंबा देखील जाहीर केला आहे. तसेच यावरून भाजपने आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली तरी आपण घाबरत नाही. असा इशारा देखील यावेळी कुकडे यांनी दिला आहे.
शेवगाव नगरपरिषदेमध्ये गणितं बदलली; एकनिष्ठांना डावलने राजळेंना भारी पडणार…
दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक नगर परिषदांवर भाजपचे अनेक नगरसेवक तसेच काही नगराध्यक्ष देखील बिनविरोद निवडून आले असल्याने बाजपवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं आहे की, भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती! बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा! दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा. अशी टीका पवार यांनी केली.
