‘क्या हार मे, क्या जीत में..’ अटल बिहारी वाजपेयी यांची कविता म्हणत राजकीय कार्यकर्त्यांना धनंजय मुंडेंचे शांततेचे आवाहन

‘क्या हार मे, क्या जीत में..’ अटल बिहारी वाजपेयी यांची कविता म्हणत राजकीय कार्यकर्त्यांना धनंजय मुंडेंचे शांततेचे आवाहन

Dhananjay Munde : बीड लोकसभा निवडणूक (Beed Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून ते संपेपर्यंत वेगवेगळ्या मुद्यांमुळे चर्चेत होती. मात्र आता निवडणूक संपली असून माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला आहे मात्र तरीही देखील सोशल मीडियावर (Social Media) जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यात यावेळी लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला असून या निवडणुकीत विजयी उमेदवाराचे आम्ही अभिनंदन सुद्धा केले आहे मात्र तरीही देखील सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट व्हायरल केले जात आहे यामुळे जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासीयांची आहे असं आवाहन त्यांनी आपल्या या व्हिडिओ मेसेजमध्ये केले आहे.

पुढे धनंजय मुंडे म्हणाले, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै या कवितेप्रमाणे मी आणि पंकजा मुंडेंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत मात्र सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडिओ व्हायरल करून वातावरण दूषित करण्याचा प्रत्यन होत आहे तसेच अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहे यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विंनंती आहे की हे आता थांबलं पाहिजे.

तसेच मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास देखील उपस्थित नव्हतो मात्र तरीही मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक व्हायरल होत आहे.  या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

ओडिशात भाजपचा ऐतिहासिक विजय, मुख्यमंत्री पदांसाठी ‘हे’ नाव चर्चेत

याच बरोबर 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातींना एकत्र घेऊन गावगाडा चालवायची शिकवण दिली, आज त्या शिकवणी पासून परावृत्त न होता, आपला गावगाडा व आपली सामाजिक एकतेची परंपरा अबाधित ठेवणे हे सर्व जिल्हा वासीयांचे आद्य कर्तव्य असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube