ते दुटप्पी पण सरकार नाही, हिंदी सक्तीवरून शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं

ते दुटप्पी पण सरकार नाही, हिंदी सक्तीवरून शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं

Eknath Shinde Criticize Udhhav Thackeray On Hindi Complusion for 1st standerd : राज्यात सध्या हिंदी भाषेला विरोध (Hindi Language Dispute) वाढू लागला आहे. या मुद्द्यावर राजकारणाची धार वाढली आहे. हिंदी सक्ती नकोच असा विरोधकांचा सूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे. या सगळ्या घडामोडींवरून उपमुख्यमंत्री एकना शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

हिंदी सक्तिच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये हिंदी भाषा अनिवार्य हा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. मात्र तरी देखील ज्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कोणताही निर्णय जबरदस्तीने घेतला जाणार नाही.

तुमचे विधान चुकीचे, फडणवीसांनी फटकारताच लोणीकर म्हणाले, ‘मी हजारवेळा माफी मागेल, पण…’

तसेच उद्धव ठाकरेंच्या काळात हिंदी सक्तीचा अहवाल आला होता. तरी देखील ते आता केवळ सरकारला विरोध करायचा म्हणून जर विरोध करत असतील तर ते दुटप्पी आहेत. मात्र सरकार अशी दुटप्पी भूमिका घेणार नाही. अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कान्होबा देवस्थानात आमदारांच्या हस्ते आरती; पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडला धार्मिक विधी

‘तो’ अहवाल ठाकरेंनीच स्वीकारला

उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, हिंदी अनिवार्य नाही. हिंदीसक्ती शासनाला करायची नाही. हे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मातृभाषेविषयी आम्हाला अभिमान आहे. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. सरकार विश्वमराठी संमेलन भरवते. महिलासांठी, युवकांसाठी मराठी साहित्य संमेलन आयोजितत करते. जेएनयूमध्ये आपण मराठी अध्यसन केंद्र तयार केलं. जम्मूमध्ये पुस्तकाचे गाव तयार केलं. मात्र, हिंदी भाषेला विरोध करून मराठीबद्दल त्यांनाच फक्त प्रेम आहे आणि आम्हाला नाही, हा फेक नॅरेटीव्ह विरोधक पसरवत आहे, असं सामंत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube