तुमचे विधान चुकीचे, फडणवीसांनी फटकारताच लोणीकर म्हणाले, ‘मी हजारवेळा माफी मागेल, पण…’

तुमचे विधान चुकीचे, फडणवीसांनी फटकारताच लोणीकर म्हणाले, ‘मी हजारवेळा माफी मागेल, पण…’

Devendra Fadnavis on Babanrao Lonikar : भाजप आमदार बबनराव लोणीक (Babanrao Lonikar) शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. तेच कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्यांच्या मायचा पगार अन् त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदींनी (PM Modi) दिले. तुझ्या अंगावरील कपडे आणि पायातील बूट, चप्पल सुध्दा आमच्यामुळेच असल्याचं ते म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. लोणीकरांचे हे विधान चुकीचे असून त्यांना देणार, असं ते म्हणाले. त्यानंतर लगेच लोणीकरांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

कान्होबा देवस्थानात आमदारांच्या हस्ते आरती; पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडला धार्मिक विधी 

फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना लोणीकरांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, बबनराव लोणीकरांचे (Babanrao Lonikar) विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं असं विधान केलं असलं तरी ते चुकीचं आहे. असे विधान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान म्हणतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत. आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं, ते चुकीचे आहे. अशी विधाने करणे योग्य नाही. तशी समज बबनरावांना देण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.

FASTag होणार सुपर टॅग! चार्जिंगपासून पार्किंगपर्यंत सगळंच करणार फास्टॅग; वाचा सरकारचं प्लॅनिंग 

त्यानंतर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत ते शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही,असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले, राजकीय पक्षांचे काही गावपातळीवरील कार्यकर्ते गावात आहेत. ते पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ट्रोल करतात. मी त्यांच्याबद्दल बोललो. आमची भाषा खेड्यातली आहे. आम्ही वडिलांना बाप आणि आईला माय म्हणतो. जर एखाद्या मुलाने काम केले नाही, नीट शिकला नाही तर त्याला कार्ट म्हणतात. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोललो. गेल्या ४० वर्षांत मी कधीही शेतकऱ्यांविरुद्ध बोललो नाही. काही राजकारणी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढतातेत. जनता जनार्दन माझी मायबाप आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी २५ वर्षांपासून निवडून येत आहे. त्यामुळं माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरिबांच्या किंवा शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही. मी शेतकऱ्यांची एकदा काय हजार वेळा माफी मागेन. पण, मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही, असं लोणीकर म्हणाले.

काय म्हणाले होते लोणीकर?
ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरणे केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदींनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या आण बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरील कपडे आणि पायातील बूट, चप्पल सुध्दा आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो, अशी भाषा लोणीकरांनी वापरली.

लोणीकर यांनी केलेल्या या विधानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. रोहिणी खडसे, जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube