माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान! विजय वडेट्टीवार संतापले…

Minister Vijay Wadettiwar Reaction On BJP MLA Babanrao Lonikar : सध्या राज्यात आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलेलं आहे. शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात. भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी, असं कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी म्हटलंय.
दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते; भास्कर जाधवांची पुन्हा खदखद, ठाकरे गटात खळबळ
वडेट्टीवार संतापले…
सरकारी योजना या भाजपने स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिल्यागत सांगणं ही महाराष्ट्रातील जनतेची थट्टा आहे. हे पैसे जनतेचे आहेत, त्यात महायुतीच्या मंत्र्यांच कर्तृत्व म्हणजे धनादेश वाटताना फोटो काढून (Maharashtra Politics) घेणं. सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा तुम्ही आज सत्तेत आहात ते शेतकरी आणि जनतेच्या मतांमुळे, आणि तोच शेतकरी गरज पडल्यास तुमचं मूल्यही शून्यावर आणू शकतो, असा इशाराच थेट विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
‘ शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात’ !
भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना… pic.twitter.com/50hofXob2a
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 26, 2025
शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात, असं वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं होतं. परतूर तालुक्यातील वाटूर गावात ‘हर घर सोलर’ योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात लोणीकर बोलत होते. यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्या विशेषत: तरुण ‘रिकामचोट’ आहे असं म्हणत टीका केली. हेच गावातील 9 ते 10 लोक भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त आहेत, असं टीका करतात लोणीकर म्हणाले आहे. तसंच पुढे त्यांनी सरकारकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर देखील निशाणा साधला आहे.
रक्तरंजित संध्याकाळ! पार्टीत गॅंगवार, अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू
तुम्हाला माचिसची डब्बीही…
लोणीकर म्हणाले की, पारावर बसणारे काही रिकामचोट तरुण लिहितात की, गावातील 9 ते 10 लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत. ते मोदी अन् फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? पण, गावामध्ये जे काही मिळालंय, ते गेल्या 25 वर्षांत मीच दिलंय. इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने तुम्हाला माचिसची डब्बीही आणून दिली नाही, असं देखील लोणीकरांनी म्हटलं आहे.