प्रफुल्ल साळुंखे मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिले आहेत. नार्वेकर यांनी सादर केलेले वेळापत्रक आतापर्यंत दोनवेळा फेटाळून लावत न्यायालयाने त्यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना आणखी वेळ वाढवून देण्यास नकार देत आता न्यायालयानेच मुदत […]
Maratha reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) राज्याच्या कानाकोपऱ्यात वातावरण तापलं आहे. यातही मराठवाड्यात या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडल्या आहेत. यात बीडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यालय, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर आणि गाड्या पेटवून देण्यात आले. याशिवाय […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंगच पेटल्याचं दिसून येत आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून राज्यभरातील अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याचदरम्यान खासदार आमदारांच्या राजीनाम्याचं सत्रही सुरु झाल्याचं पाहायला […]
Riteish Deshmukh On Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. तसेच अनेक कलाकार देखील […]
यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. राज्यातील परिस्थितीत चिघळत चालली आहे. यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. […]
Sanjay Raut : भीमा-कोरेगाव सारखी पेटवा-पेटवी व्हावी, असं सरकारला वाटतंय, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. संजय राऊत आज अहमदनगर दौऱ्यावर होते. श्रीगोंद्यातील ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; […]