आजच्या दिवस छत्री जवळ ठेवाच! पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; अंदाज काय?

Maharashtra Monsoon Update : राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस सर्वदूर बरसत (Maharashtra Monsoon Update) आहे. ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. काल मुंबई, नवी मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस (IMD Rain Alert) झाला. काल हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. ढगाळ हवामान आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात येत्या 13 ऑगस्टपासून एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. आज मात्र राज्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
सावधान! आज राज्यात ठिकठिकाणी मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना मिळाला पावसाचा अलर्ट
मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत हलका पाऊस होईल अशी शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यांत हलका पाऊस होईल. यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीत आज तर लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत सोमवारी तसेच नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कालपासून राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिक 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या नागरिकांना सूचना
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
मुसळधार पावसाचा कहर! मृतांचा आकडा 30 पार, 80 हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर