यंत्रणेवर विश्वास नाहीच, सीबीआय चौकशी करा; अपघात प्रकरणी नाना पटोलेंची मागणी

यंत्रणेवर विश्वास नाहीच, सीबीआय चौकशी करा; अपघात प्रकरणी नाना पटोलेंची मागणी

Nana Patole News : राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाहीच, त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलीयं. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी (Pune Accident) अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याचं दिसून येत आहेत. विरोधकांकडूनही सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अशातच नाना पटोलेंनीही सरकारला धारेवर धरत सडकून टीका केलीयं. ते मुंबईत बोलत होते.

Kartik Aaryan: प्रतीक्षा संपली! कधी रिलीज होणार ‘भूल भुलैया 3’? अभिनेत्याने केला खुलासा

नाना पटोले म्हणाले, सध्या राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असतानाच नागपूर, जळगाव, पुण्यात संताप आणण्याचे प्रकार घडले आहेत. अपघात प्रकरणी श्रीमंत आरोपींना तातडीने जामीन मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले आहेत. श्रीमंतांना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचं दिसून आल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, त्यामुळे अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची आग्रही मागणी नाना पटोले यांनी केलीयं.

पुण्यात श्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते, यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण आहे? हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले, असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी घेतलाय ब्रेक, पहिल्या सामन्यात फक्त 8 खेळाडू; नेमकं कारण काय?

गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना 10 तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावडेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, येथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावडे यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण? हे जनतेला समजले पाहिजे, अशीही मागणी नाना पटोले यांनी केलीयं.

तसेच सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.

अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्यास काँग्रेसचा विरोध..
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा डाव भाजपाने रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही. मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही. संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापी यशस्वी होणार नाही. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश खपवून घेणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज