आषाढी सोहळ्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन तयारीत; उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार

Pandharpur Wari 2025 : सध्या राज्यभरातच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. (Rain) पुण्यातही पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे उजनीक धरणाडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 58 हजार 585 क्युसेक झाला आहे. तर अजूनही हा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. सध्या झपाट्याने उजनी धरणाची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे आषाढी सोहळ्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या आहेत.
धरणाने 75 टक्के पर्यंत पाणी पातळी
जून महिन्यातच एवढा प्रचंड पाणीसाठा जमा होऊ लागल्याने संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरण 75 टक्के वर गेल्यानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असून 75 टक्के एवढी धरणाची पातळी आषाढी यात्रा संपेपर्यंत कायम ठेवण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे आता येईल ते सर्व पाणी पंढरपुरात महापूर येणार नाही याची दक्षता घेत भीमा नदीमध्ये सोडून संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार; वाचा, हवामान विभागाचा अंदाज
आज जर धरणाने 75 टक्के पर्यंत पाणी पातळी गाठल्यास उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे. जवळपास 60 हजार क्युसिक विसर्गने पाणी धरणाकडे येत असल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे.
धोकादायक पुलावरून वाहतूक
नांदेडमध्ये कंधार- नायगांव तालुक्याला जोडणाऱ्या कौठा गावाजवळचा पुल धोकादायक बनलाय, तब्बल 60 वर्षांहून अधिक जीर्ण असलेल्या या पुलाचे कठडे तुटून गेले आहेत. या पुलावरून अनेकदा वाहन खाली पडून अपघात झाले आहेत. दरम्यान, कंधारचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी याच रस्त्यावरून पर्यटक मोठ्या संख्येने येजा करतात. त्यामुळे या ठिकाणच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.