‘उत्तम कामगिरी करूनही’ Sanju Samson टीम इंडियामधून बाहेर? हे मोठे कारण आले समोर

‘उत्तम कामगिरी करूनही’ Sanju Samson टीम इंडियामधून बाहेर? हे मोठे कारण आले समोर

IND vs AUS : यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे (Sanju Samson) निवडकर्त्यांनी परत एकदा दुर्लक्ष केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला संधी देण्यात आली नाही. अपघातामुळे ऋषभ पंत (Rishabh Pant) दीर्घकाळ टीम इंडियातून (Team India) बाहेर राहणार आणि संघ व्यवस्थापनाला सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजांचा पर्यायही दिसत नाही, अशा वेळीही संजू सॅमसनची निवड झाली नाही. विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला प्रत्येक वेळी टीम इंडियातून वगळण्यात येते. संजू सॅमसनने गेल्या ८ वर्षांपासून भारतासाठी केवळ २८ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत. संजू सॅमसनला भारतीय संघात आणि बाहेर राहावे लागले आहे. संजू सॅमसनबरोबर टीम इंडियावर प्रत्येक वेळी अन्याय होण्यामागे हे एक मोठे कारण ठरलं आहे.

चांगली कामगिरी करूनही टीम इंडियातून का वगळले ?

बीसीसीआयने २८ वर्षीय संजू सॅमसनची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निवड न करून त्याचे मोठे नुकसान केले. बीसीसीआय गेल्या काही काळापासून संजू सॅमसनकडे सतत दुर्लक्ष करत आहे. यावरून संजू सॅमसन बीसीसीआयच्या हातातील बाहुले बनल्याचे स्पष्ट झाले आहे. संजू सॅमसनने २०१५ मध्ये भारतासाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तेव्हापासून आतापर्यंत तो टीम इंडियामध्ये बाहेर आहे. संजू सॅमसनने गेल्या ८ वर्षांपासून भारतासाठी केवळ २८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. संजू सॅमसन एक स्फोटक फलंदाज आहे, उत्कृष्ट यष्टीरक्षक असण्याबरोबरच तो क्षेत्ररक्षणातही खूप योगदान देतो.

हे मोठे कारण समोर आले

सध्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला संधी दिली आहे, मात्र तो या सर्व संधींची पूर्तता करू शकलेला नाही. ईशान किशनचे वनडेत द्विशतक वगळता त्याने टीम इंडियासाठी गेल्या १० डावांत एकही अर्धशतक झळकावला नाही. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इशान किशनला एकाही सामन्यात दुहेरी आकडा गाठला नाही. अशा परिस्थितीत संजू सॅमसनऐवजी इशान किशनला अधिक संधी का दिली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना

सतत अन्याय होतोय

बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशन दरम्यान म्हणाले होते, ‘संजू सॅमसन चांगली कामगिरी करत आहे. आम्ही संजू सॅमसनची संघात निवड केली नाही, तर लोक आम्हाला ट्विटरवर जोरदार टीका करतात. त्याचवेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते, ‘संजू सॅमसनसारख्या खेळाडूला कोणत्याही परिस्थितीत किमान १० सामने दिले पाहिजेत.’ संजू सॅमसनने भारतासाठी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये २ अर्धशतकांसह ३३० धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने १७ टी-२० सामन्यात ३०१ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने T20 सामन्यात केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. कोणत्याही क्रिकेटपटूकरिता टीम इंडियातून बाहेर पडणे खूप वेदनादायी आहे, कारण यानंतर परत भारतीय संघात पुनरागमन करणे खूप कठीण आहे. एकापेक्षा एक गुणवान खेळाडूंच्या उपस्थितीमुळे भारतीय संघ निवडीत जोरदार स्पर्धा बघायला मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube