हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
IMD Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी मान्सून आजच दाखल झाल्याची माहिती आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दाखल झाला आहे.
आजही राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD Alert : राज्यातील अनेक शहरात तापमान 40 अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांना अनेक अडीअडचणीला तोंड द्यावे लागत आहे तर दुसरीकडे भारतीय हवामाव विभागाने पुढील दोन – तीन दिवस राज्यातील 4 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगली (Sangli) , रत्नागिरी (Ratnagiri) […]
IMD Alert Heavy rain In Next 48 Hours : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकतोय, तर दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्तवली जातेय. राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे आहेत. आयएमडीने (IMD Alert) राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अचानक वातावरणामध्ये मोठा बदल झालेला दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुढील 48 तासांमध्ये मुसळधार […]
चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. ज्यात पुढील तीन दिवसांत विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे मात्र कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल झाला आहे. मुंबईत तापमानात वाढ झाली आहे.