मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं; कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

  • Written By: Published:
मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं; कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे उपोषणाला बसले होते. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही जरांगेंची भूमिका होती. या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. अखेर सरकारनं नमतं घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंची भेट घेत आरक्षण देण्याचं मान्य केलं. त्यानंतर जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेतलं. दरम्यान, यावरून आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना (Nana Patole) मोठं वक्तव्य केलं. जरांगेंना मुख्यमंत्र्यांनीच उपोषण बसवलं होतं, असा आरोप त्यांनी केला.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सरकारने मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांची विकासकामे जाहीर केली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यानंतर नाना पटोले यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी जालन्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण उपोषणावर हीप्रश्न उपस्थित केले. मनोज जरांगेंनी जालन्याच्या अंतरवली गावात सतरा दिवस उपोषण केले. मात्र जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसवलं होतं, असा आरोप पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. थेट उपोषणकर्त्यांवरच पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Solapur: लोकसभेच्या तोंडावर मोंदीचा धमाका; सोलापुरला होणार मोठी कामगार वसाहत, पंतप्रधानच्या हस्ते होणार लोकार्पण

पटोले म्हणाले की, जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. 31 तारखेच्या मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले. मात्र 1 तारखेला दुपारी 3 वाजता गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होती. केवळ सभेवरून लक्ष वळवण्यासाठी लाठीचार्जची घटना घडल्याचा आरोप पटोले यांनी केला.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनीच जरांग पाटलांना उपोषणाला बसवले होते, हे आता सिद्ध झाले आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीस यांनी माफीही मागितली. दोन समाजात भांडणं लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आरक्षणावर बोलताना पटोले म्हणाले की, आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे मागास आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोणाच्या तोंडचा घास हिरावून नव्हे, तर जातीनिहाय जनगणना करून मिळालं पाहिजे. ओबीसींना 27 टक्के आणि तसेच मराठा, धनगर यांना 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिलं पाहिजे, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube