‘राज्यात शंभर टक्के परिवर्तन होणार, समीकरणे जुळवणं सुरू…’, जरांगेंकडून सर्व पत्ते ओपन

  • Written By: Published:
‘राज्यात शंभर टक्के परिवर्तन होणार, समीकरणे जुळवणं सुरू…’, जरांगेंकडून सर्व पत्ते ओपन

 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवण्याची घोषणा केल्याने सर्वच पक्ष धास्तावले. ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार देणार अन् जिथं शक्यता कमी वाटते, तिथं जे उमेदवार आमच्या मागण्यांना समर्थन देतील, तिथं त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला.

‘भोर’मध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका; शंकर मांडेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार 

राज्यभर शंभर टक्के परिवर्तन होणार, आम्ही राज्यात कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, समीकरणं जुळणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आमचे समीकरणं जुळवणे सुरू आहेत. एका जातीवर निवडणुका लढवल्या जात नाहीत. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळं मराठा, मुस्लीम, दलित एकत्र यायला पाहिजे, मग राज्यभर शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं, असं जरांगे म्हणाले.

भाजपची तिसरी यादी जाहीर, फडणवीसांचे PA सुमित वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात

पुढं ते म्हणाले, राज्यातील बांधवाना कालच सांगितलं की, तुम्ही इकडे गर्दी करू नका. गर्दी जमली की परिवर्तन होतं असं नाही. तुम्ही इकडे गर्दी केली मला काही काम सुचत नाही. अंतरवलीत 29 तारखेपर्यंत येऊ नका. मला निर्णय प्रक्रिया पूर्ण करू द्या. येत्या 30 तारखेला बैठक असून या बैठकीत काय होतं हे बघू. दलित, मुस्लिमांचा काय निर्णय होतोत ते बघू अन् निर्णय घेऊ, असं जरांगे म्हणाले.

जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतील लोक भेट आहेत. याबाबत ते म्हणाले की, मी सहा कोटी मराठा समाजाची नाराज करणार नाही. सहा कोटी मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं जरांगे म्हणाले.

तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवाल? असा प्रश्न केला असता जरांगे म्हणाले की, सध्या इतके भावी आमदार झालेत. मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही, अशी मिश्कील टिप्पणी जरांगेंनी केली.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मोठे साहेब तिथे बसले आहेत. उपसरपंचाच्या हातात सगळं आहे. पण, यावेळेस उपसरपंचाचा करेक्ट कार्यक्रम शेतकरी करणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube