- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Chinchwad By Election : नाना काटेंच्या विजयाबद्दल जयंत पाटलांचं मोठं विधान…
पुणे : पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच 20 हजारांपेक्षा कमी मते मिळाली तर कलाटेना तिकीट मागणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसंतयं. आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या […]
-
Election Commission : सुषमा अंधारेंनी निवडणूक आयोगालाही सोडलं नाही…
मुंबई : उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधकांवर टीका-टिपण्या करण्यात कायमच चर्चेत राहिल्या आहेत. शिवसेनेसच्या सत्तासंघर्षानंतर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून अंधारे सतत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर टीकेची तोफ डागत असतात. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अधारे यांनी निवडणूक आयोगालाही सोडलेलं नसल्याचं दिसून आलं आहे. ज्या लोकांची संसदीय लोकशाही व […]
-
SambhajiRaje Chatrapati : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरेंनी…
मुंबई : मी आणि उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहतो अन् शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरे यांनी फसवलं असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संभाजीराजे म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या राजकीय दृष्ट्या अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेला जागा […]
-
Sambhaji Raje Chhatrapati म्हणाले, खासदारकीचं स्वप्न पूर्ण झालं अन् वडिलांना मिठी मारली
मुंबई : मी लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर खूप कष्ट केले, त्यानंतर मी खासदार झालो, माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, त्याक्षणी माझ्या मनात सर्व काही भरुन आलं आणि त्या फ्लोमध्ये मी वडीलांचे आशिर्वाद घेऊन त्यांना कडकडून मिठी मारल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान सांगताना संभाजीराजे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक हरलो तेव्हा मला खूप वाईट […]
-
फडणवीस अन् पवारांचं राजकारण कसं? Sambhaji Raje Chhatrapati यांनी स्पष्ट सांगितलं
मुंबई : राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी एकमेकांचे आलेले अनुभव मुलाखतीतून सांगत असतात. असाच एक स्वराज्य संघटनेचे प्रमुख अनुभव संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल सांगितला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत कितीही चांगले संबंध असतील, पण ते माझ्या पाठीमागे काय करत असतील मला माहित नसल्याचं संभाजीराजेंनी एका मुलाखतीद्वारे सांगितलंय. संभाजीराजे म्हणाले, […]
-
आदित्य ठाकरे यांची कशी पंचाईत झाली, कोश्यारी यांनी रंगवून सांगितले
मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेदरम्यान आदित्य ठाकरेंनी अनेकदा दिल्लीत फोन केले मात्र कोणी आलेच नाही, मी पुढे आलो तेव्हा आदित्य ठाकरेंना मी सांगितलं की तुम्ही बहुमत सिध्द झाल्याचं पत्र घेऊन तेव्हा आदित्य ठाकरे निराश होऊन बाहेर गेल्याचं माजी राज्यपाल भगतसिंह यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेदरम्यान घडलेल्या गोष्टींबाबत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी […]
-
अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर नवीन कार्यकारिणीची निवड
अहमदनगर : अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपीठावर […]
-
अमित शाह यांच्या पत्नी सोनम यांचं माहेरात मराठीतून भाषण, शाळेच्या आठवणी सांगितल्या
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी त्या कोल्हापूरातील ज्या शाळेत शिकल्या, त्या शाळेच्या शतकमहोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी पती अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावली. सोनल शाह यांनी या शाळेच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या. सोनल यांनी आपल्या भाषणात शाळेचा, वर्गाचा, वर्गमैत्रिणी, शिक्षक, ज्या वर्गात बसत होत्या तेथील बेंच, फळा, एकमेकींच्या डब्यातील […]
-
Sanjay Gaikwad म्हणाले, आता ती वेळ आलीय…,
बुलढाणा : आता संजय राऊतांचं थोबाड फोडायची वेळ आलीय, असल्याचा इशाराच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. संजय राऊत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या भाषेत वक्तव्य करीत आहे त्यामुळे आता त्यांची थोबाड फोडायची आणि जीभ हासाळण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले आहेत. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर संजय राऊत कायमच विरोधकांवर निशाणा साधत असतात. उद्धव […]
-
Maharashtra Politics : संजय राऊतांना शहाजीबापू पाटलांचा विषारी टोला…
सोलापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी असल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी लगावला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. शहाजीबापू पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा दोन हजार कोटींचा व्यवहार झाला, […]









