सावळा गोंधळ करुन योजना जाहीर केल्या असल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं. ते बीडमध्ये बोलत होते.
जनतेने लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु असतानाच मराठा आंदोलकांनी थेट मंचावरच चढत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीयं. लातूरमध्ये शिवस्वराज यात्रेत ही घटना घडलीयं.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मला लोकसभा लढवायची नव्हती, पण समोरच्याची जिरवली, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांंनी माजी खासदार सुजय विखेंना लगावलायं. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
महाविकास आघाडी देईल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणुका लढवण्यास तयार, अशी खुली ऑफर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलीयं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना मार्मिक टोला लगावलायं.
म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण झाल्याचं समोर आलं असून एका नागरिकाची 50 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकरणी सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलायं.
तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमिनीधारकांना द्यायला नाहीत, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला पुन्हा एकदा चपराक दिलीयं.
माझ्या वडिलांसह शहीदांचा अपमान झाला असल्याचं भाष्य माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केलंय.