'वक्फ' बोर्डाच्या दुरुस्ती विधेयक लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल झाल्याची बातमी कल्पोकल्पित असून जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या एका लाडक्या बहिणीने पैशांमधून व्यवसाय सुरु करुन दीड हजारांची गुंतवणूक करुन दहा हजार रुपये कमवले आहेत.
भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्या कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध असून आमचा वाद मिटला असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणेंनी वादावर पांंघरुण घातलंय.
कोलकत्ता अत्याचार आणि हत्या प्रकरणी आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्याने मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय.
जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर राष्ट्रवादी पक्ष विरोध करत राहील, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीयं. ते आळंदीत कार्यक्रमात बोलत होते.
सीताराम येचुरी यांचा मृतदेह नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांना अभ्यास आणि संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय येचुरी कुटुंबियांनी घेतलायं.
ऑगस्ट महिन्यात एसटीचे 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांनी फायद्यात असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिलीयं.
देवेंद्र फडणवीस चाणक्य, हुशार वाटायचे पण फोडाफोडीतच हुशार असल्याची जहरी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते जालन्यात बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.