- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
सरपंचाचे अधिकार कायम: दोन वेळा मतदान करण्याविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळली
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड आणि औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, लीला रोडे, मुक्तार शेख यांनी उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान अधिकाराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. कोणत्याही निवडणुकीत एका उमेदवाराला एकदाच मतदान करण्याचा मतदाराला अधिकार असतांना, उपसरपंच […]
-
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की, पाच जणांना अटक
पुणे : शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे अनेक उदाहरणं समोर येत आहेत. नुकतेच मार्केट यार्ड परिसरात एकाने सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता त्यानंतर खडकी परिसरातून देखील अशीच बातमी समोर येत आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या साउंडवर कारवाई करणाऱ्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना खडकीतील मुळा रस्ता परिसरात घडली […]
-
दिपाली सय्यदचे काँग्रेसला खिंडार; श्रीगोंद्यात सहा नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला धक्का दिला आहे. मंगळवारी श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांनी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात प्रवेश केला. श्रीगोंदा नगरपालिकेत शिंदे गटाचा पुढील नगराध्यक्ष करण्यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या वर्षा बंगल्यावर पाठपुरावा करीत होत्या. यातूनचं त्यांनी काँग्रेसला […]
-
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र: मुख्यमंत्री शिंदेंच एक पाऊल पुढं
मुंबई : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापूर्वीच बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षांची अधिकृत युती आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या निमित्तानं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार […]
-
थरारक सामन्यात भारताचा दोन धावांनी विजय
मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दोन धावांनी थरारक विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीनं चार बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. त्यावेळी दिलशान मदुशंका रनआऊट झाला आणि हा थरारक सामना भारताने दोन धावांनी जिंकला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना […]
-
आजपासून राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा
पुणे : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जनजागर यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा राज्यभर निघणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आवाज उठवला जाणार आहे. आज ( 4 जानेवारी 2023) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यात्रेला झेंडा दाखवणार आहेत. मोदी सरकराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात आवाज […]
-
त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अजित पवार यांच्याकडून राणेंना टोला
मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते […]
-
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख जाहीर
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आज चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या. […]
-
श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं आव्हान
मुंबई : दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं टार्गेट दिलंय. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 150 […]
-
प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. सुमित्रा सेन यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं. सुमित्रा सेन यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची […]










