काँग्रेसची सत्ता जाऊन 2014 मध्ये देशात मोदी सरकार स्थापन झाले. मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात केंद्राने अनेक योजना आणल्या. त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
डिसेंबर महिन्यापासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठीचा हिरवा कंदील आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाने दाखवलाय. डिसेंबर महिन्यात, बैलगाडा शर्यतीवरील बंदी या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना कायदेशीर […]
पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी त्यांची सडेतोड मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मनातली व्यथा सांगितली.
येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्या अगोदर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शांतता व सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? राज्यांमध्ये मतांचे ध्रुवीकरण करून जातीय जंगली भडकवण्याची कामे काही गटांकडून केली जात आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ईडीच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी संवाद साधला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. 10 वर्षानंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत असलेले सरकार स्थापन करता येणार आहे. मात्र भाजपचा कर्नाटकात पराभव होण्याची कारणं कोणती होती हे या व्हिडिओमधून जाणून घ्या..
माजी खासदार राजू शेट्टी यांनी लेट्सअपसभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सत्तेचा चेंडू हा विधानसभा अध्यक्ष यांच्या कोर्टात गेलाय. नक्की अध्यक्ष काय निर्णय घेणार? कधी घेणार? उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत? सध्या जनतेच्या मनात काय भावना आहेत? या सर्वांबाबत मंत्रालयातील वरीष्ठ पत्रकारांना काय वाटते? हे जाणून घेतलंय आमचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार का? शिंदे सरकार राहणार की जाणार? मुख्यमंत्री बदलणार का? अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी मिळालेली नाहीत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. याचा निकाल उद्या म्हणजेच 11 मेला लागणारंय. या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमके काय परिणाम होऊ शकतात? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.