सुखी संसारासाठी तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची कथा; ‘सुख कळले’ रसिकांच्या भेटीला

सुखी संसारासाठी तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची कथा; ‘सुख कळले’ रसिकांच्या भेटीला

Marathi Serial : महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी ( Marathi Serial ) आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय.

नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूकंपाचे केंद्र

आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘सुख कळले!’

ठाकरेंची यादी जाहीर होताच काँग्रेसचा भडका; “उद्धवजी हे योग्य नाही, फेरविचार करा”, थोरातांचा संताप

सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे ? हे सांगणारी त्यांच्या निखळ निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ 22 एप्रिलला कलर्स मराठीवर दाखल होतेय.

नाशिक, सातारा काय ठरलं? अजितदादा म्हणतात, उद्या सगळंच क्लिअर होईल

याचा पहिलाच गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आलाय. आणि माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय. या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली असून सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube